शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शेतीमाल खरेदी करणारी बनावट व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

बबन इंगळे बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन ...

बबन इंगळे

बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या वर्षापासून सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या टोळीचा प्रताप नुकताच उघडकीस आला असून, प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील ४० शेतकऱ्यांकडून सोयाबीन, कापूस व हरभरा जादा भावाच्या आमिषाने खरेदी केला. काही कालावधीनंतर चूकारे करतो, असे सांगून शेतातूनच शेतीमाल मोजमाप करून घेऊन गेल्याचा प्रकार पोलीस विभागाला दिलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे.

तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतकरी गणेश नानोटे, नारायण राठोड, रामराव राठोड, घन:श्याम जाधव, मनोज नानोटे, ओमप्रकाश जाधव, हिम्मत राठोड, ओमप्रकाश नानोटे, महादेव नानोटे, गणेश नानोटे, रोहिदास राठोड, मारुती नानोटे, रामकिसन राठोड, भीमराव नानोटे, किसन नानोटे, ब्रम्हानंद राठोड, सहदेव नानोटे, लक्ष्मण जाधव, विनायक राठोड, पवन आवटे, दत्ता बोबडे, प्रमिला जाधव, वनिता राठोड, कमला चव्हाण, बाळू नानोटे, गणेश रामराव नानोटे आदी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल तालुक्यात बनावट व्यापारी बनून फिरणारे संदीप रमेश राठोड, बाळू प्रल्हाद राठोड, गोपाल बाबूराव नानोटे, श्रीकांत भास्कर काळे, रवींद्र सहाकर आदींनी घेऊन, लाखोचा गंडा घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नुकतीच केली आहे. दोषींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे. असाच प्रकार तालुक्यातील खडकी, धामणदरी येथील गोरसिंग चव्हाण, उमराव चव्हाण, सुनील चव्हाण, सुधाकर चव्हाण, वामन चव्हाण, वसंता राठोड या शेतकऱ्यांसोबत सुद्धा घडल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना सुद्धा १० ते १२ लाख रुपयाचा गंडा घालून त्यांचा शेतीमाल धनादेश देऊन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

-------------------------

मी मागीलवर्षी शेतातील सोयाबीन मळणी यंत्राने काढून पोती भरणे सुरू असताना संदीप राठोड याने शेतातच सौदा करून सोयाबीन नेले. परंतु अद्यापही पैसे दिले नसल्याने फसवणूक झाली.

- उमराव चव्हाण, शेतकरी, खडकी.

-------------------

असे करायचे शेतकऱ्यांची फसवणूक...

तालुक्यातील बनावट व्यापारी शेतीमाल काढणी सुरू असताना थेट ओळखीच्या शेतकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या शेतावर जायचे. तेथेच त्यांना सध्या असलेल्या बाजारभावापेक्षा ज्यादा दर देण्याचे आमिष दाखवून शेतातच शेतीमालाची खरेदी करायचे. विश्वासासाठी धनादेश देत होते. ज्या शेतकऱ्यांना पैशाची आर्थिक अडचण नाही, असे शेतकरी यांच्या आमिषाला बळी पडून शेतीमाल देत होते.

------------------------