शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमाल खरेदी करणारी बनावट व्यापाऱ्यांची टोळी सक्रिय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:14 IST

बबन इंगळे बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन ...

बबन इंगळे

बार्शीटाकळी : बळीराजाने शेतात घाम गाळून पिकविलेला शेतीमाल जादा भावाने खरेदी करण्याचे आमिष दाखवून व विश्वासात घेऊन शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी बार्शीटाकळी तालुक्यात गेल्या वर्षापासून सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या टोळीचा प्रताप नुकताच उघडकीस आला असून, प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील ४० शेतकऱ्यांकडून सोयाबीन, कापूस व हरभरा जादा भावाच्या आमिषाने खरेदी केला. काही कालावधीनंतर चूकारे करतो, असे सांगून शेतातूनच शेतीमाल मोजमाप करून घेऊन गेल्याचा प्रकार पोलीस विभागाला दिलेल्या तक्रारीतून उघडकीस आला आहे.

तालुक्यातील काजळेश्वर येथील शेतकरी गणेश नानोटे, नारायण राठोड, रामराव राठोड, घन:श्याम जाधव, मनोज नानोटे, ओमप्रकाश जाधव, हिम्मत राठोड, ओमप्रकाश नानोटे, महादेव नानोटे, गणेश नानोटे, रोहिदास राठोड, मारुती नानोटे, रामकिसन राठोड, भीमराव नानोटे, किसन नानोटे, ब्रम्हानंद राठोड, सहदेव नानोटे, लक्ष्मण जाधव, विनायक राठोड, पवन आवटे, दत्ता बोबडे, प्रमिला जाधव, वनिता राठोड, कमला चव्हाण, बाळू नानोटे, गणेश रामराव नानोटे आदी शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल तालुक्यात बनावट व्यापारी बनून फिरणारे संदीप रमेश राठोड, बाळू प्रल्हाद राठोड, गोपाल बाबूराव नानोटे, श्रीकांत भास्कर काळे, रवींद्र सहाकर आदींनी घेऊन, लाखोचा गंडा घालून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे नुकतीच केली आहे. दोषींविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तक्रारीतून केली आहे. असाच प्रकार तालुक्यातील खडकी, धामणदरी येथील गोरसिंग चव्हाण, उमराव चव्हाण, सुनील चव्हाण, सुधाकर चव्हाण, वामन चव्हाण, वसंता राठोड या शेतकऱ्यांसोबत सुद्धा घडल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना सुद्धा १० ते १२ लाख रुपयाचा गंडा घालून त्यांचा शेतीमाल धनादेश देऊन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.

-------------------------

मी मागीलवर्षी शेतातील सोयाबीन मळणी यंत्राने काढून पोती भरणे सुरू असताना संदीप राठोड याने शेतातच सौदा करून सोयाबीन नेले. परंतु अद्यापही पैसे दिले नसल्याने फसवणूक झाली.

- उमराव चव्हाण, शेतकरी, खडकी.

-------------------

असे करायचे शेतकऱ्यांची फसवणूक...

तालुक्यातील बनावट व्यापारी शेतीमाल काढणी सुरू असताना थेट ओळखीच्या शेतकऱ्यांच्या व नातेवाईकांच्या शेतावर जायचे. तेथेच त्यांना सध्या असलेल्या बाजारभावापेक्षा ज्यादा दर देण्याचे आमिष दाखवून शेतातच शेतीमालाची खरेदी करायचे. विश्वासासाठी धनादेश देत होते. ज्या शेतकऱ्यांना पैशाची आर्थिक अडचण नाही, असे शेतकरी यांच्या आमिषाला बळी पडून शेतीमाल देत होते.

------------------------