शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

गांधीजींच्या सभेमुळे संचारले होते नवचैतन्य

By admin | Updated: October 2, 2016 02:17 IST

स्वातंत्र्यलढय़ात अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांनी नोंदवला होता सहभाग.

राहुल सोनोने वाडेगाव(जि. अकोला), दि. 0१- भारताला ब्रिटिशांच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन केले होते. त्यांची एक सभा १९३३ मध्ये वाडेगावातही झाली होती. या सभेनंतर युवकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. वाडेगावातील धनजीभाई ठक्कर हे मुंबईला महात्मा गांधी यांच्या भाषणाला उपस्थित होते. तेथील ते भाषण त्यांना पसंत पडले व तरुणांनो तुम्ही खेड्यामध्ये जा आणि स्वातंत्र्याचे वारे पसरवा, असा संदेश त्या भाषणातून महात्मा गांधींनी युवकांना दिला होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद धनजीभाई ठक्कर यांनी प्रतिसाद दिला. वाडेगावातून ११0 लोकांनी स्वातंत्र्याचा लढा देताना शिक्षा भोगली होती. ही माहिती धनजीभाई ठक्कर यांनी महात्मा गांधींना सांगितली होती व महात्मा गांधी यांना वाडेगावात येण्यासाठी विनंती केली होती. १९३३ साली महात्मा गांधी यांची विदर्भाची बारडोली म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाडेगावात निगरुणा नदीच्या पात्रामध्ये रेतीच्या टेकडीवर मोठी सभा बोलविण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी वाडेगाववासीयांनी बेसिक शाळेपासून ते जागेश्‍वर मंदिराच्या मागच्या बाजूपर्यंंत केळीच्या बन लावल्या होत्या. त्यावेळी गांधीजींच्या सभेला परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या सभेचे अध्यक्ष धनजीभाई ठक्कर हे होते. या सभेत महात्मा गांधी यांनी हिंदीमधून भाषण दिले होते. या भाषणामुळे स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. गांधीजींनी यावेळी तुम्ही या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा, असे आवाहन युवकांना केले होते. अकोल्यातील नेते ब्रिजलाल बियाणीसुद्धा या सभेला उपस्थित होते. त्यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले होते. महात्मा गांधींनी या ठिकाणी ४५ मिनिटे भाषण केले होते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे गाव बारडोली असलेल्या गावामधून मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य सैनिक तयार झाले होते. ती बारडोली म्हणजे देशाची बारडोली म्हणून ओळखली जायची म्हणून या वाडेगावला विदर्भाची बारडोली नाव दिले होते. ह्यस्वराज तो आनेवालाही है, अपने देश में अपना राज होना. ये लोग व्यापार करने के लिए अपने देश में आए है. स्वराज मिलने के लिए इसमें शामील हो आवोह्ण, असे आवाहन गांधीजींनी यावेळी केले होते.