शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजींच्या सभेमुळे संचारले होते नवचैतन्य

By admin | Updated: October 2, 2016 02:17 IST

स्वातंत्र्यलढय़ात अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांनी नोंदवला होता सहभाग.

राहुल सोनोने वाडेगाव(जि. अकोला), दि. 0१- भारताला ब्रिटिशांच्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी विविध ठिकाणी सभा घेऊन स्वातंत्र्य सैनिकांना मार्गदर्शन केले होते. त्यांची एक सभा १९३३ मध्ये वाडेगावातही झाली होती. या सभेनंतर युवकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. वाडेगावातील धनजीभाई ठक्कर हे मुंबईला महात्मा गांधी यांच्या भाषणाला उपस्थित होते. तेथील ते भाषण त्यांना पसंत पडले व तरुणांनो तुम्ही खेड्यामध्ये जा आणि स्वातंत्र्याचे वारे पसरवा, असा संदेश त्या भाषणातून महात्मा गांधींनी युवकांना दिला होता. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद धनजीभाई ठक्कर यांनी प्रतिसाद दिला. वाडेगावातून ११0 लोकांनी स्वातंत्र्याचा लढा देताना शिक्षा भोगली होती. ही माहिती धनजीभाई ठक्कर यांनी महात्मा गांधींना सांगितली होती व महात्मा गांधी यांना वाडेगावात येण्यासाठी विनंती केली होती. १९३३ साली महात्मा गांधी यांची विदर्भाची बारडोली म्हणून ओळखल्या जाणार्‍या वाडेगावात निगरुणा नदीच्या पात्रामध्ये रेतीच्या टेकडीवर मोठी सभा बोलविण्यात आली होती. त्यांच्या स्वागतासाठी वाडेगाववासीयांनी बेसिक शाळेपासून ते जागेश्‍वर मंदिराच्या मागच्या बाजूपर्यंंत केळीच्या बन लावल्या होत्या. त्यावेळी गांधीजींच्या सभेला परिसरातील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. या सभेचे अध्यक्ष धनजीभाई ठक्कर हे होते. या सभेत महात्मा गांधी यांनी हिंदीमधून भाषण दिले होते. या भाषणामुळे स्वातंत्र्य सैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले होते. गांधीजींनी यावेळी तुम्ही या स्वातंत्र्य लढय़ात सहभागी व्हा, असे आवाहन युवकांना केले होते. अकोल्यातील नेते ब्रिजलाल बियाणीसुद्धा या सभेला उपस्थित होते. त्यांनीसुद्धा यावेळी मार्गदर्शन केले होते. महात्मा गांधींनी या ठिकाणी ४५ मिनिटे भाषण केले होते. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचे गाव बारडोली असलेल्या गावामधून मोठय़ा प्रमाणात स्वातंत्र्य सैनिक तयार झाले होते. ती बारडोली म्हणजे देशाची बारडोली म्हणून ओळखली जायची म्हणून या वाडेगावला विदर्भाची बारडोली नाव दिले होते. ह्यस्वराज तो आनेवालाही है, अपने देश में अपना राज होना. ये लोग व्यापार करने के लिए अपने देश में आए है. स्वराज मिलने के लिए इसमें शामील हो आवोह्ण, असे आवाहन गांधीजींनी यावेळी केले होते.