शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांपासून गांधीग्राम-अकोट मार्ग बंद; वंचित युवा आघाडीने केला निषेध

By रवी दामोदर | Updated: March 12, 2023 15:27 IST

अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे.

अकोला - गांधीग्राम येथील पुलाला तडा गेल्याने गत सहा महिन्यांपासून गांधीग्राम-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही उपाययोजना न केल्याने वंचित युवा आघाडीने रविवार, दि.१२ मार्च रोजी निषेध व्यक्त करीत आंदोलन केले.

अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. सहा महिने उलटून देखील यासंदर्भात उपाययोजना झाली नसून, याउलट तत्पुरत्या स्वरुपाचा पूल बनवून वाहतूक सुरू करण्याचा देखावा, तसेच त्याचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनीधी हरविल्याच्या घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या. त्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे बॅनर आंदोलनामध्ये झळकविले. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, जय तायडे, संघटक रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, दादू लांडगे, मंगेश सवंग, विजय भटकर, दीपक ठाकूर, विकास सावळे, आकाश गवई, आकाश जंजाळ, निशांत राठोड, नंदकिशोर मापारी, अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनिल वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, रंजीत तायडे आदी उपस्थित होते.

पुर्णेच्या जलाचा महादेवाला अभिषेक

याप्रसंगी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण होऊन अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग लवकर सामान्यांसाठी खुला होऊन वाहतूक सुरळीत सुरू होऊ दे अशी मागणी करीत अकोला वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीच्यावतीने पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला. तसेच हरवलेल्या लोकप्रतिनीधींना शोधून देण्याचे देवाला साकडे घातले. शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या.