शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

सहा महिन्यांपासून गांधीग्राम-अकोट मार्ग बंद; वंचित युवा आघाडीने केला निषेध

By रवी दामोदर | Updated: March 12, 2023 15:27 IST

अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे.

अकोला - गांधीग्राम येथील पुलाला तडा गेल्याने गत सहा महिन्यांपासून गांधीग्राम-अकोट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे.त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सहा महिन्याचा कालावधी उलटूनही उपाययोजना न केल्याने वंचित युवा आघाडीने रविवार, दि.१२ मार्च रोजी निषेध व्यक्त करीत आंदोलन केले.

अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प आहे. त्यामुळे सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. सहा महिने उलटून देखील यासंदर्भात उपाययोजना झाली नसून, याउलट तत्पुरत्या स्वरुपाचा पूल बनवून वाहतूक सुरू करण्याचा देखावा, तसेच त्याचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करण्यात येत असल्याचा आरोप याप्रसंगी करण्यात आला. खासदार संजय धोत्रे, अकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रणधीर सावरकर आदी लोकप्रतिनीधी हरविल्याच्या घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या. त्यांना शोधून देणाऱ्या ५१ रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येईल, असे बॅनर आंदोलनामध्ये झळकविले. वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या मार्गदर्शनात आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर यांच्यासह दादाराव पवार, ॲड. प्रशिक मोरे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, जय तायडे, संघटक रितेश यादव, वैभव खडसे, नागेश उमाळे, दादू लांडगे, मंगेश सवंग, विजय भटकर, दीपक ठाकूर, विकास सावळे, आकाश गवई, आकाश जंजाळ, निशांत राठोड, नंदकिशोर मापारी, अनंता इंगळे, रामदास वानखडे, अनिल वानखडे, निखिल तायडे, दीपक दरोकर, निशांत दारोकर, अमर वानखडे, रंजीत तायडे आदी उपस्थित होते.

पुर्णेच्या जलाचा महादेवाला अभिषेक

याप्रसंगी वाहतुकीसाठी बंद असलेल्या मार्गाचे काम पूर्ण होऊन अकोला-गांधीग्राम-अकोट मार्ग लवकर सामान्यांसाठी खुला होऊन वाहतूक सुरळीत सुरू होऊ दे अशी मागणी करीत अकोला वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हा कार्यकारणीच्यावतीने पूर्णा नदीचे पवित्र जल घेऊन महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला. तसेच हरवलेल्या लोकप्रतिनीधींना शोधून देण्याचे देवाला साकडे घातले. शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांचे बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आल्या.