शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
5
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
6
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
7
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
8
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
9
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
10
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
11
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
12
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
13
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
14
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
15
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
16
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
17
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
18
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
19
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
20
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...

तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:31 IST

अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील घटना.

दानापूर (जि. अकोला) : संपूर्ण जिल्हा कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असताना उष्माघाताने येथील एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. कैलास महादेव फुसे असे या तरुणाचे नाव असून, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यंदाच्या उन्हाळय़ात उष्माघाताचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. कैलास फुसे हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दिवसभर काबाडकष्ट करून कैलास फुसे घरी परत आले. उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांना रात्री ताप आला. रात्री घरगुती उपचार केल्यानंतर ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी ते प्रात:विधीसाठी बाहेर गेले. परत येताना त्यांना भोवळ आली व ते वान नदीच्या पात्रात कोसळले. काही ग्रामस्थांनी त्यांना उचलून घरी आणले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली; परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. कैलास फुसे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कैलास फुसे हे मूळचे जळगाव जिल्हय़ातील वळोदा (पानाचे) गावचे रहिवासी होते. येथे ते त्यांच्या सासरवाडीत स्थायिक झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर वळोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.