शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
5
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
6
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
7
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
8
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
9
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
10
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
11
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
12
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
13
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
14
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
15
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
16
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
17
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
18
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
19
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
20
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2016 02:31 IST

अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील घटना.

दानापूर (जि. अकोला) : संपूर्ण जिल्हा कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत असताना उष्माघाताने येथील एका ३५ वर्षीय विवाहित तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. कैलास महादेव फुसे असे या तरुणाचे नाव असून, गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. यंदाच्या उन्हाळय़ात उष्माघाताचा हा जिल्ह्यातील पहिलाच बळी आहे. कैलास फुसे हे मिळेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. बुधवारी दिवसभर काबाडकष्ट करून कैलास फुसे घरी परत आले. उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांना रात्री ताप आला. रात्री घरगुती उपचार केल्यानंतर ते झोपी गेले. गुरुवारी सकाळी ते प्रात:विधीसाठी बाहेर गेले. परत येताना त्यांना भोवळ आली व ते वान नदीच्या पात्रात कोसळले. काही ग्रामस्थांनी त्यांना उचलून घरी आणले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली; परंतु तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. कैलास फुसे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कैलास फुसे हे मूळचे जळगाव जिल्हय़ातील वळोदा (पानाचे) गावचे रहिवासी होते. येथे ते त्यांच्या सासरवाडीत स्थायिक झाले होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. गुरुवारी दुपारी त्यांच्यावर वळोदा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.