शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

शेतांमध्ये गोठले पाणी!

By admin | Updated: December 19, 2014 01:04 IST

अकोल्यातील प्रकार : बघ्यांची गर्दी

पिंजर (अकोला) : पाऊस पडला नाही, ढगाळ वातावरण नाही, फक्त कमालीची थंडीचा कडाका वाढला असताना, अकोला जिल्ह्यातील निंबी खुर्द येथील नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी गोठून बर्फाचे जाड पापुद्रे तयार झाल्याचा प्रकार १८ डिसेंबर रोजी घडला. गावात या प्रकाराची माहिती वार्‍यासारखी पसरून, ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.बार्शिटाकळी तालुक्यातील निंबी खुर्द येथील माजी सरपंच नागोराव चव्हाण हे १८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास शेतात कुटार आणण्यास गेले असता, त्यांना शेतात जमिनीवर चपातीच्या आकाराचे, थोडे लांबसर बर्फाचे पापुद्रे विखुरलेले आढळले. त्यापैकी काही बर्फाचे पापुद्रे त्यांनी सोबत घेऊन गाव गाठले. ते पाहून गावातील काही मंडळीनी शेताकडे धाव घेतली. या प्रकाराची चर्चा परिसरातील गावांमध्ये पसरून, तेथील लोकांनीही चव्हाण यांच्या शेताला भेट दिली. त्यांना शेजारील शेतांमध्येही असेच बर्फाचे पापुद्रे जमिनीवर आढळून आले.यावर कृषी विद्यसपीठाचे कृषी हवामानशास्त्रज्ञ डॉ.संजय वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्यक्ष गारा अथवा पाऊस पडल्यानंतर किंवा तापमान शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली गेल्याशिवाय असे घडू शकत नसल्याचे स्पष्ट करून असा प्रकार घडलेल्या शेतात प्रत्यक्ष गेल्याशिवाय व तेथील स्थितीचा अभ्यास केल्याशिवाय ते नेमके कशामुळे झाले याबाबत आपण खात्रीने सांगू शकत नसल्याचे स्पष्ट केले. *४.४४ अंश सेल्सिअसलाच होते पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरुहिवाळ्य़ात जलसाठे वातावरणात उर्जा उत्सर्जित करतात. त्यामुळे पृष्ठभागानजिकचे पाणी थंड होते. थंड झाल्यामुळे त्याचे घनत्व वाढते आणि ते तळाशी जाते. एकदा का पृष्ठभागावरील पाण्याचे तापमान २ अंश सेल्सिअसच्या खाली गेले, की ते गोठायला सुरुवात होते. पाणी गोठण्यासाठी त्याचे तापमान शून्य अंश सेल्सिअसपर्यंतच खाली जाणे आवश्यक नसते. पाणी गोठण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी पृष्ठभागापासून तळापर्यंतच्या पाण्याचे तापमान ४.४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहाचेणे आवश्यक असते. ही प्रक्रिया सर्वप्रथम काठालगतच होऊ शकते.