शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

बोंडअळीग्रस्तांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 18:22 IST

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे.

अकोला : जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत वाटपाच्या तिसºया हप्त्यापोटी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची गरज आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी पुन्हा निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांसाठी शासनामार्फत मदत जाहीर करण्यात आली होती. जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त १ लाख ४५ हजार कापूस उत्पादक शेतकºयांच्या मदतीसाठी १३५ कोटी ५१ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. शासन निर्णयानुसार बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांना तीन हप्त्यात मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार मदत वाटपाचा पहिला व दुसरा हप्ता मिळून जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ९० कोटी ३४ लाख रुपयांचा मदत निधी शासनामार्फत प्राप्त झाला होता. उपलब्ध मदत निधी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित तिसºया व अंतिम हप्त्यातील मदत जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करण्यासाठी ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने मदत निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १ सप्टेंबर रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला; मदत निधी प्राप्त झाला नसल्याने, पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १० सप्टेंबर रोजी बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आला.परंतू, जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी अद्यापही ४५ कोटी १७ लाख ७४ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी वारंवार निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आल्याचे चित्र आहे.निधी केव्हा प्राप्त होणार?बोंडअळीग्रस्त शेतकºयांना वाटप करावयाच्या तिसºया व अंतीम हप्त्याचा निधी अद्याप शासनामार्फत प्राप्त झाला नसल्याने, मदत निधी केव्हा प्राप्त होणार, याबाबत मदतीच्या लाभापासून वंचीत असलेल्या जिल्ह्यातील बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकºयांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती