शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 30, 2016 01:45 IST

अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.

राजेश शेगोकार/ बुलडाणा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर म्हणून पाहिले जाणार्‍या अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून अंबाबरवा गाव येत्या पंधरवड्यात पूर्णपणे उठविले जाणार आहे. अभयारण्यातील सर्व सहा गावे उठल्यानंतर वाघांना मध्यप्रदेशातील सिपना ते अंबाबरवा असा मोठा जंगलपट्टा मुक्त संचार करण्यासाठी मिळणार आहे. अंबाबरवा परिसर २00३ पासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे; मात्र तरीही अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. येथील एकूण सहा गावांचे पुनर्वसन अभिप्रेत आहे. त्यापैकी खिडकी, चुनखडी आणि अंबाबरवा या तीन गावांसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यातील या तीन गावांच्या ७४0 कुटुंबांचे प्रारंभी पुनर्वसन करावयाचे होते. त्यांच्या याद्यांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ५१७ कुटुंबे पुनर्वसन आणि मदतीसाठी पात्र ठरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी १0 मे २0१५ रोजी अंबाबरवा अभयारण्याला अनपेक्षितपणे भेट देऊन ग्रामस्थांनी शासकीय नियमानुसार रोख रक्कम घेऊन पुनर्वसीत व्हावे, अशी भूमिका मांडली होती. यावेळी तीनही गावांमध्ये ग्रामस्थांची सभा त्यांनी घेतली होती. १४ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात ही बैठक मोलाची ठरली होती. गुरुवार, २८ एप्रिल रोजी अंबाबरवा गावात आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक झाली. त्यानुसार १५ मेपर्यंत अंबाबरवा गावातील ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत गाव सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.