शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 30, 2016 01:45 IST

अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.

राजेश शेगोकार/ बुलडाणा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर म्हणून पाहिले जाणार्‍या अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून अंबाबरवा गाव येत्या पंधरवड्यात पूर्णपणे उठविले जाणार आहे. अभयारण्यातील सर्व सहा गावे उठल्यानंतर वाघांना मध्यप्रदेशातील सिपना ते अंबाबरवा असा मोठा जंगलपट्टा मुक्त संचार करण्यासाठी मिळणार आहे. अंबाबरवा परिसर २00३ पासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे; मात्र तरीही अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. येथील एकूण सहा गावांचे पुनर्वसन अभिप्रेत आहे. त्यापैकी खिडकी, चुनखडी आणि अंबाबरवा या तीन गावांसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यातील या तीन गावांच्या ७४0 कुटुंबांचे प्रारंभी पुनर्वसन करावयाचे होते. त्यांच्या याद्यांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ५१७ कुटुंबे पुनर्वसन आणि मदतीसाठी पात्र ठरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी १0 मे २0१५ रोजी अंबाबरवा अभयारण्याला अनपेक्षितपणे भेट देऊन ग्रामस्थांनी शासकीय नियमानुसार रोख रक्कम घेऊन पुनर्वसीत व्हावे, अशी भूमिका मांडली होती. यावेळी तीनही गावांमध्ये ग्रामस्थांची सभा त्यांनी घेतली होती. १४ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात ही बैठक मोलाची ठरली होती. गुरुवार, २८ एप्रिल रोजी अंबाबरवा गावात आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक झाली. त्यानुसार १५ मेपर्यंत अंबाबरवा गावातील ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत गाव सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.