शहरं
Join us  
Trending Stories
1
'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
2
लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
3
भ्रष्टाचार करुन पैसे खाल्ले, हेही फलकावर लिहा; कामचोर म्हणत एकनाथ शिंदे यांची टीका
4
अंबरनाथ, बदलापूर तो झाँकी हैं, कल्याण-डोंबिवली बाकी हैं! शिंदेसेनेला खिंडीत पकडण्याची खेळी
5
सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसले, नियंत्रण रेषेवर घुसखोरीची भीती, सुरक्षा दल हाय अलर्टवर
6
शिवतीर्थावर राज ठाकरेंचा पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुरुवातीलाच अदानीवर घाव, म्हणाले...  
7
बाळासाहेब असते तर.. त्यांना आनंद झाला असता; पहिल्यांदाच राज यांनी बोलून दाखविली मनातील भावना
8
"मुंबईचे पुन्हा बॉम्बे करण्याचा डाव"; शिवाजी पार्कवरील सभेत उद्धव ठाकरेंचा आरोप
9
पुण्यातून निवडणूक लढवणार का?, देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
10
"...नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे"; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावले
11
IND vs NZ : ना अनुष्का ना वामिका! जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी थेट ‘या’ व्यक्तीकडे पाठवतो विराट, म्हणाला…
12
BMC Elections 2026 : "साडे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात..."; जयंत पाटलांची भाजपावर टीका
13
WPL 2026 : अनुष्का शर्मानं 'फ्लाइंग शो'सह जेमीचा षटकार रोखला! अखेरच्या षटकात सोफीनं सामना फिरवला
14
कोणी अभिनेता, कोणी लावणी डान्सर तर कोणी राजकारणी; एका क्लिकवर वाचा 'बिग बॉस मराठी ६'मधील स्पर्धकांची संपूर्ण यादी
15
IND vs NZ : कोहली-गिलची फिफ्टी; वॉशिंग्टन लंगडत खेळला! KL राहुलनं सिक्सर मारत जिंकून दिला रंगतदार सामना
16
'अकबराच्या बापाचा बाप...', नाशिक कुंभमेळ्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे वक्तव्य
17
Virat Kohli Nervous Nineties Record : किंग कोहलीनं धमाका केला; पण शतक अवघ्या ७ धावांनी हुकलं अन्...
18
BMC Elections 2026 : 'ठाकरे ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार संपत नसतो'; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
19
'सोनावणे वहिनी' फेम सोशल मीडिया स्टार करण सोनावणेची 'बिग बॉस मराठी ६'च्या घरात धमाकेदार एन्ट्री
20
Virat Kohli Record : किंग कोहलीचा 'फिफ्टी प्लस'चा पंच; संगकाराचा महारेकॉर्डही मोडला आता फक्त...
Daily Top 2Weekly Top 5

अंबाबरवा अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

By admin | Updated: April 30, 2016 01:45 IST

अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला.

राजेश शेगोकार/ बुलडाणा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा कॉरिडॉर म्हणून पाहिले जाणार्‍या अंबाबरवा अभयारण्यातील तीन गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला असून अंबाबरवा गाव येत्या पंधरवड्यात पूर्णपणे उठविले जाणार आहे. अभयारण्यातील सर्व सहा गावे उठल्यानंतर वाघांना मध्यप्रदेशातील सिपना ते अंबाबरवा असा मोठा जंगलपट्टा मुक्त संचार करण्यासाठी मिळणार आहे. अंबाबरवा परिसर २00३ पासून व्याघ्र प्रकल्प घोषित करण्यात आला आहे; मात्र तरीही अभयारण्यातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. येथील एकूण सहा गावांचे पुनर्वसन अभिप्रेत आहे. त्यापैकी खिडकी, चुनखडी आणि अंबाबरवा या तीन गावांसंदर्भात प्राधान्याने निर्णय घेण्यात आला आहे. अंबाबरवा अभयारण्यातील या तीन गावांच्या ७४0 कुटुंबांचे प्रारंभी पुनर्वसन करावयाचे होते. त्यांच्या याद्यांची फेरतपासणी करण्यात आल्यानंतर प्रत्यक्षात ५१७ कुटुंबे पुनर्वसन आणि मदतीसाठी पात्र ठरली होती. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी १0 मे २0१५ रोजी अंबाबरवा अभयारण्याला अनपेक्षितपणे भेट देऊन ग्रामस्थांनी शासकीय नियमानुसार रोख रक्कम घेऊन पुनर्वसीत व्हावे, अशी भूमिका मांडली होती. यावेळी तीनही गावांमध्ये ग्रामस्थांची सभा त्यांनी घेतली होती. १४ वर्षांपासून रखडलेला पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढण्यात ही बैठक मोलाची ठरली होती. गुरुवार, २८ एप्रिल रोजी अंबाबरवा गावात आकोट वन्यजीव विभागाचे उप वनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांसोबत बैठक झाली. त्यानुसार १५ मेपर्यंत अंबाबरवा गावातील ग्रामस्थांनी ऐच्छिक पुनर्वसन अंतर्गत गाव सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.