शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास माेफत वीज; मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त; ९० सिंचन प्रकल्प मार्गी

By आशीष गावंडे | Updated: June 11, 2025 19:52 IST

बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल.

- आशिष गावंडे

अकाेला: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत विदर्भातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास मोफत वीज पुरवठा केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की, या योजनेद्वारे डिसेंबर २०२६ पर्यंत १६,००० मेगावॅट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, बळीराजा जलसंजीवनी याेजनेतून विदर्भातील रखडलेले ९० सिंचन प्रकल्प मार्गी लागल्याने सिंचन क्षेत्रात लक्षणीय वाढ होऊन शेती उत्पादनात सुधारणा होईल.

व्यासपिठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, कामगार मंत्री तथा अकाेला जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण, प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर आदी उपस्थित हाेते. अकोल्यात ११ जून रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते २,६०० कोटी रुपयांच्या निधीतून मंजूर झालेल्या १९ विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आले. यादरम्यान, भाजपच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब मैदानावर ‘विकास संवाद सभे’ चे आयाेजन करण्यात आले हाेते. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले की, २०२७ पर्यंत विदर्भाचा अनुशेष संपेल, असा आम्हाला विश्वास आहे. महायुती सरकारच्या धोरणांमुळे विदर्भातील पायाभूत सुविधांमध्ये मोठी प्रगती होत असून, भविष्यातील विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नाही!राज्यात दणक्यात महायुतीचे सरकार आले. विधानसभा निवडणुकीतील हा विजय खुर्च्या ताेडण्यासाठी नव्हे तर सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी मिळाला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यापुढे शासकीय कार्यालयांसाठी १०० दिवसांचा नव्हे तर १५० दिवसांसाठी आराखडा तयार केला जाइल,असे त्यांनी सांगितले.यापुढे शेतीसाठी ‘एआय’चा वापरशेतीमधून कमी खर्चात जास्त उत्पादकता मिळवण्यासाठी भविष्यात ‘एआय’चा वापर केला जाइल. किड प्रतिबंधक उपाय, खतांचा वापर करताना ‘एआय’ची मदत घेतली जाइल. आधुनिक शेतीकडे वाटचाल करण्यासाठी शासनाकडून ठाेस पाऊले उचलली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस