शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

पिंजर परिसरात काढ्याचे मोफत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

----------------------------------------------- निहिदा परिसरात नेटवर्कची समस्या निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम निहिदा, पिंजर, साखरखेर्डा यासह अन्य गावांत टॉवर असून, नेटवर्क ...

-----------------------------------------------

निहिदा परिसरात नेटवर्कची समस्या

निहिदा : बार्शीटाकळी तालुक्यातील ग्राम निहिदा, पिंजर, साखरखेर्डा यासह अन्य गावांत टॉवर असून, नेटवर्क नसल्याने ग्राहकांची अडचण होते. नेटवर्कअभावी बॅंकेचे व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांसह ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

--------------------------------------

बेवारस श्वानांमुळे नागरिकांना त्रास

अकोट : शहरात अनेक दिवसांपासून बेवारस श्वानांचा धुमाकूळ सुरू आहे. याचा नाहक त्रास सामान्यांना सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिक पालिका प्रशासनाला तक्रारी देण्यात आल्या. परतु, श्वानांच्या बंदोबस्ताकडे दुर्लक्ष होत आहे.

-------------------------------------

वृक्षांच्या कत्तलीमुळे पर्यावरणप्रेमींत रोष

वाडेगाव : जिल्ह्यातील बऱ्याच मार्गांवर विकासकामांच्या आड येणाऱ्या वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचे नुकसान होत आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यात रस्ता कामात हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. नवीन झाडांचे संगोपन व्यवस्थित केले जात नाही.

-----------------------------

भरमसाट विद्युत देयकाने ग्राहक त्रस्त

आगर : सध्याच्या काळात नागरिकांसाठी विद्युत अविभाज्य अंग झाले आहे. परंतु, आगर परिसरातील अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांना मीटर वाचन न करताच विद्युत देयके दिली जात असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

------------------------------------------

मोबाईलचा अतिवापर ठरतोय धोकादायक

पातूर : नागरिकांना मोबाईल जीव की प्राण झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या हातात खेळण्याप्रमाणे स्मार्टफोन, सुपरफोन दिसतात. मोबाईलचा हा अतिवापर आजारांना जन्म देणारा ठरत आहे. कानासह डोळे व डोक्याचे आजार जडत आहेत.

---------------------------------------

शेतकरी आता पीक कर्जाच्या प्रतीक्षेत

तेल्हारा : खरीप हंगाम सुरू होण्यास अवघा एक महिन्याचा कालावधी शिल्लक असताना अजूनही बँकांनी कर्ज वाटप सुरू केले नसल्याने शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत. गतवर्षीच्या खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

-----------------------------------------------

विवाहावर निर्बंध, वधूपित्याची तारांबळ

चिखलगाव : कोरोनामुळे २५ जणांच्या उपस्थितीत विवाह उरकायचा आहे. त्यामुळे वधूपित्याची तारांबळ उडत आहे. केवळ दोन तासांत लग्न आटोपताना त्यांची दमछाक होते.

-------------------------------------------------

पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट

पातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे येथील पंचायत समिती कार्यालयात शुकशुकाट दिसून येत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारने गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, शासकीय कार्यालयांत कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती संख्येत घट केली आहे.

------------------------------------

उकाड्यात विजेचा लपंडाव सुरूच

खानापूर : वातावरणात प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात वारंवार वीज गुल होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

-----------------------------------

बार्शीटाकळी तालुक्यात सरपणासाठी धावपळ

बार्शीटाकळी : ग्रामीण भागातील महिला सरपणासाठी धावपळ करीत आहेत. दरवर्षी अनेक महिला उन्हाळ्यात सरपण गोळा करतात. हेच सरपण पुढे वर्षभर कामी येते. उज्ज्वला गॅस योजनेनंतरही महिलांची धावपळ अजून संपली नाही.

-------------------------------------------