शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
4
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
5
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
6
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
7
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
8
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
9
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
10
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
11
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
12
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
13
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
14
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
15
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
16
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
17
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
18
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
19
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
20
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

By admin | Updated: June 26, 2017 09:41 IST

उद्दिष्टपूर्ती नाही; केवळ २१ तलावांमध्येच काम सुरू; अकोला जिल्ह्यातील स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गाव तलाव आणि २० पाझर तलावांतील गाळ काढण्यात येणार होता, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ६ मे रोजी जिल्हा परिषद व जलसंधारण (लघुसिंचन) विभागाला दिले होते; मात्र वळिवाचा पाऊस अन् प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे गाळमुक्त धरण योजनेला फटका बसला आहे. जिल्हाभरातील केवळ २१ तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र तीसुद्धा आता पावसामुळे खंडित झाली आहे. जिल्ह्यात पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत गाळ काढण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांच्या नियोजनातच अधिक वेळ गेल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील ११ तलावांची निवड झाली होती. प्रत्यक्षात आठ तलावांमध्ये काम सुरू केले. बाळापुरात आठपैकी केवळ तीन, पातूर तालुक्यात १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सिंचन तलाव सहा, पाझर तलाव नऊ, गाव तलाव १५ आहेत. यांपैकी सिंचन तलाव चार, पाझर तलाव सात, गाव तलाव ११ यातील गाळ काढणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ दोन कामे सुरू झालीत, अकोटमध्ये सातपैकी तीन, तेल्हारामध्ये चारपैकी दोन, बार्शीटाकळीमध्ये ११ पैकी तीन तलावांतील काम सुरू झाले. लोकसहभागही नाही शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना प्रशासनला होत्या, तसेच गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डीझलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण जिल्हाभरातून केवळ १२४ शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका अनेक गावांना बसला. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील देवळी हे गावसुद्धा आहे. येथील ग्रामस्थांनी सुकळी येथील तलावामधून गाळ काढण्यासाठी कार्यकारी अभियंता जलसंधारण यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र त्यांचा अर्ज तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षेत ठेवत अखेर परवानगी नाकारण्यात आली.