शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

By admin | Updated: June 26, 2017 09:41 IST

उद्दिष्टपूर्ती नाही; केवळ २१ तलावांमध्येच काम सुरू; अकोला जिल्ह्यातील स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गाव तलाव आणि २० पाझर तलावांतील गाळ काढण्यात येणार होता, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ६ मे रोजी जिल्हा परिषद व जलसंधारण (लघुसिंचन) विभागाला दिले होते; मात्र वळिवाचा पाऊस अन् प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे गाळमुक्त धरण योजनेला फटका बसला आहे. जिल्हाभरातील केवळ २१ तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र तीसुद्धा आता पावसामुळे खंडित झाली आहे. जिल्ह्यात पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत गाळ काढण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांच्या नियोजनातच अधिक वेळ गेल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील ११ तलावांची निवड झाली होती. प्रत्यक्षात आठ तलावांमध्ये काम सुरू केले. बाळापुरात आठपैकी केवळ तीन, पातूर तालुक्यात १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सिंचन तलाव सहा, पाझर तलाव नऊ, गाव तलाव १५ आहेत. यांपैकी सिंचन तलाव चार, पाझर तलाव सात, गाव तलाव ११ यातील गाळ काढणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ दोन कामे सुरू झालीत, अकोटमध्ये सातपैकी तीन, तेल्हारामध्ये चारपैकी दोन, बार्शीटाकळीमध्ये ११ पैकी तीन तलावांतील काम सुरू झाले. लोकसहभागही नाही शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना प्रशासनला होत्या, तसेच गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डीझलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण जिल्हाभरातून केवळ १२४ शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका अनेक गावांना बसला. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील देवळी हे गावसुद्धा आहे. येथील ग्रामस्थांनी सुकळी येथील तलावामधून गाळ काढण्यासाठी कार्यकारी अभियंता जलसंधारण यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र त्यांचा अर्ज तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षेत ठेवत अखेर परवानगी नाकारण्यात आली.