शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

गाळमुक्त धरण योजनेला दिरंगाईचा फटका!

By admin | Updated: June 26, 2017 09:41 IST

उद्दिष्टपूर्ती नाही; केवळ २१ तलावांमध्येच काम सुरू; अकोला जिल्ह्यातील स्थिती.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात ५० गाव तलाव आणि २० पाझर तलावांतील गाळ काढण्यात येणार होता, त्यासाठी पावसाळ्यापूर्वी कामांचे नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी ६ मे रोजी जिल्हा परिषद व जलसंधारण (लघुसिंचन) विभागाला दिले होते; मात्र वळिवाचा पाऊस अन् प्रशासकीय दप्तर दिरंगाईमुळे गाळमुक्त धरण योजनेला फटका बसला आहे. जिल्हाभरातील केवळ २१ तलावांमधील गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र तीसुद्धा आता पावसामुळे खंडित झाली आहे. जिल्ह्यात पाझर तलाव आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागामार्फत गाळ काढण्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी कामांचे नियोजन करून कामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलसंधारण (लघुसिंचन) विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे दिले. त्यानुसार संबंधित यंत्रणांमार्फत जिल्ह्यातील गाव तलाव व पाझर तलावातील गाळ काढण्याच्या कामांच्या नियोजनातच अधिक वेळ गेल्याने ही योजना प्रत्यक्षात येऊ शकली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील ११ तलावांची निवड झाली होती. प्रत्यक्षात आठ तलावांमध्ये काम सुरू केले. बाळापुरात आठपैकी केवळ तीन, पातूर तालुक्यात १०० हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता असलेले जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे सिंचन तलाव सहा, पाझर तलाव नऊ, गाव तलाव १५ आहेत. यांपैकी सिंचन तलाव चार, पाझर तलाव सात, गाव तलाव ११ यातील गाळ काढणे आवश्यक होते. प्रत्यक्षात केवळ दोन कामे सुरू झालीत, अकोटमध्ये सातपैकी तीन, तेल्हारामध्ये चारपैकी दोन, बार्शीटाकळीमध्ये ११ पैकी तीन तलावांतील काम सुरू झाले. लोकसहभागही नाही शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेंतर्गत जिल्ह्यात तलावातील गाळ काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ग्रामस्तरीय बैठका घेऊन, शेतकऱ्यांना गाळ शेतात नेण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या सूचना प्रशासनला होत्या, तसेच गाळ काढण्याची कामे लोकसहभागातून करावयाची असून, गाळ काढण्यासाठी जेसीबी व पोकलॅन्डच्या डीझलचा खर्च शासनामार्फत करण्यात येणार आहे, असेही निर्देश होते. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण जिल्हाभरातून केवळ १२४ शेतकऱ्यांनी यासाठी पुढाकार घेतला. विशेष म्हणजे, प्रशासकीय दिरंगाईचा फटका अनेक गावांना बसला. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील देवळी हे गावसुद्धा आहे. येथील ग्रामस्थांनी सुकळी येथील तलावामधून गाळ काढण्यासाठी कार्यकारी अभियंता जलसंधारण यांच्याकडे परवानगी मागितली होती; मात्र त्यांचा अर्ज तब्बल पंधरा दिवस प्रतीक्षेत ठेवत अखेर परवानगी नाकारण्यात आली.