शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चारमोळीच्या शेतकऱ्यांचे असेही दातृत्व!

By admin | Updated: May 15, 2017 00:55 IST

जलसंधारणाच्या कामांसाठी दहापैकी पाच एकर जमीन केली दान

संदीप वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कगावातील पाणी गावातच मुरावे, शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, जलसंकट दूर व्हावे, या उदात्त हेतूने जलसंधारणाच्या उपचारासाठी दुर्गम आदिवासी गावातील चुलत्या-पुतण्या शेतकऱ्यांनी आपली दहापैकी पाच एकर शेती दान दिली. त्यांच्या दातृत्वाचा इतरांनी आदर्श घेण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी शेतीच सर्वकाही असते. त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच असतो. पातूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या चारमोळी गावात जंगल असल्याने तशी शेती फारच कमी. सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गाच्या पाण्यावर येथील शेतकऱ्यांना पिके काढावी लागतात. अशातच गावाने अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला. गावातील सात लोकांनी या स्पर्धेचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणामुळे जलसंधारणासाठी काम करण्यासाठी ते पे्ररित झाले. त्यांनी हीच प्रेरणा इतर लोकांमध्ये जागृत केली. या जागृतीचा परिणाम एवढा झाला, की ग्रामस्थांनी पाषाण फोडून श्रमदान केले. जलसंधारणाचे उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. ही अडचण दूर करण्यासाठी गावातील सीताराम दगडू खुळे यांनी पाच एकरांपैकी तीन एकर, तर आकाश रामचंद्र खुळे यांनीही पाच एकरांतील दोन एकर जलसंधारणाच्या कामासाठी दान दिली. जलसंधारणाच्या कामासाठी सलग समतल चर, दगडी बांधसह इतर कामांचा समावेश होता. ही कामे झाल्यानंतर शेतीमध्ये पाणी साचणार आहे. त्यामुळे त्या जमिनीवर पीक घेता येता नाही, हे माहिती असूनही दोन्ही शेतकऱ्यांनी आपली शेती दान दिली. त्यांचे दातृत्व खरोखरच मोठे आहे. दुसऱ्यांच्या जमिनीतील एक तास आपल्याकडे खेचण्याचा हव्यास सगळीकडे असल्याचे दिसते; मात्र इतरांच्या शेतीला पाणी उपलब्ध व्हावे, त्यांना बारमाही पिके घेता यावे, या उदात्त हेतूसाठी आकाश खुळे आणि सीताराम खुळे यांनी आपली जमीन दिली. त्यांनी जमीन दिल्याने इतर शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. या शेतकऱ्यांचा आदर्श घेत गावातील महादेव किसन खुळे यांनीही आपल्या पाच एकरांपैकी एक एकर शेती सलग समतल चर निर्माण करण्यासाठी दिली आहे.पाणीटंचाई दूर होण्यासाठी दिली जमीन गावातील पाणी प्रश्न सुटावा, शेतकऱ्यांना पिकांसाठी पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही जमीन दान दिली आहे. जलसंधारणाची कामे झाल्यामुळे गुरांनाही पाणी उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणी पातळी वाढेल. तूर पिकासाठी जी पाणीटंचाई भासत होती, ती आता दूर होणार आहे. माती नाला बांधातील पाणी शेतकरी आपल्या तुरीच्या पिकासाठी वापरतील, असे सीताराम दगडू खुळे यांनी सांगितले.बांधाची निर्मिती दान मिळालेल्या जमिनीवर ग्रामस्थांनी अखंड परिश्रम करून दोन एकरांवर दगडी बांधांची निर्मिती करण्यात आली आहे, तसेच तीन एकरांवर सलग समतल चरही निर्माण करण्यात आले आहेत. महादेव खुळे यांच्या शेतातही सलग समतल चरांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो लीटर पाणी साठविल्या जाणार आहे.