शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

३३ गावांसाठी चार पोलिस

By admin | Updated: September 1, 2014 20:07 IST

३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे.

सायखेड - बाश्रीटाकळी तालुक्यातील धाबा परिसरातील ३३ गावांतील सुरक्षा आता रामभरोसेच असल्याचे दिसत आहे. ३३ गावांसाठी केवळ चार पोलिस कार्यरत असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांना कितपत यश येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बाश्रीटाकळी अंतर्गत धाबा पोलिस चौकी आहे. या परिसरातील गावांचा कारभार या चौकीच्या भरवशावरच आहे. या ठिकाणी १५ कर्मचार्‍यांची गरज असताना अपुर्‍या संख्याबळामुळे केवळ चार जणांना येथे काम पहावे लागत आहे. या परिसरात चोर्‍या, मारामार्‍या आणि किरकोळ वादाचे अनेक प्रकरणे घडली आहेत. अनेक गुन्ह्यातील आरोपी फरार आहेत. तपास रखडले आहेत. अशातच पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली कर्मचार्‍यांनी आपल्याकडील तपासातील प्रकरणे गुंडाळून ठेवली आहेत. तपास करायचा की गणपती बंदोबस्त करायचा ? हा प्रश्न या चार कर्मचार्‍यांसमोर उभा ठाकला आहे. चार कर्मचारी आपापल्या कामावर गेल्यानंतर चौकीला कुलूप असते. तक्रार देण्यासाठी कोणी आल्यानंतर त्याला येथे दिवसभर ताटकळत बसावे लागते. रात्रीच्या गस्तीवर येथे एकच कर्मचारी असतो. फार विचित्र स्थिती निर्माण झाली असताना पोलिस अधीक्षक या ठिकाणी कर्मचारी का वाढवित नाहीत? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.