शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

चार ग्रामपंचायतींच्या तपासणीचा अहवाल गुलदस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:13 IST

अकोला: जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने पातूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दोन महिन्यांपूर्वी तपासणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर ...

अकोला: जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने पातूर तालुक्यातील चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची दोन महिन्यांपूर्वी तपासणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला; मात्र त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने, चार ग्रामपंचायतींच्या तपासणीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यातच असल्याचे चित्र आहे.

ग्रामपंचायतींकडून वेळेवर कामे होत नाहीत, ग्रामसेवक कार्यालयात उपस्थित राहत नाहीत अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ग्रामस्थांकडून प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या कामकाजाची विशेष पथकामार्फत चाैकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी साैरभ कटियार यांनी दिला होता. त्यानुसार विशेष पथकामार्फत पातूर तालुक्यातील आलेगाव, झरंडी, कारला व एक अन्य अशा चार ग्रामपंचायतींच्या कामकाजाची तपासणी करण्यात आली होती. तपासणीचा अहवाल महिनाभरापूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता; परंतु या तपासणी अहवालावर अद्याप कार्यवाही करण्यात आली नसून, तपासणी अहवाल अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विशेष पथकाने चार ग्रामपंचायतींच्या कामकाजासंदर्भात

सादर केलेल्या अहवालावर केव्हा कार्यवाही होणार, याकडे लक्ष लागले आहे.