शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

अकोला, वाशिममध्ये चार शेतक-यांची आत्महत्या

By admin | Updated: September 24, 2015 01:55 IST

नापिकी, कर्ज आणि मुलीच्या लग्नाची चिंता

अकोला : अकोला जिल्ह्यातील दोन, तर वाशिम जिल्हयातील कारंजा आणि रिसोड तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी सततची नापिकी, तसेच कर्जबाजारीपणामुळे बुधवारी आत्महत्या केली. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथील शेतकरी अरूण मारोतराव फिसके (वय ४३) यांनी बुधवारी घरातच वीष प्राशन करून आत्महत्या केली. घटनेच्यावेळी घरी कुणीही नव्हते. त्यांच्या तिन्ही मुली शाळेत गेल्या होत्या, तर पत्नी मुलींना शाळेत सोडण्यासाठी गेली होती. फिसके यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती असून, सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणास ते कंटाळले होते. या चिंतेतून त्यांनी बुधवारी जिवनयात्रा संपवली. पातूर येथील शेतकरी मधुकर इनामदार यांचा मोठा मुलगा गणेश (वय २५) याने नापिकी व कर्जबाजारीपणास कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन बुधवारी आत्महत्या केली. मधुकर इनामदार यांच्याकडे एकूण दीड एकर शेती आहे. या शेतीची व परिवाराची संपूर्ण जबाबदारी गणेशवरच होती. मधुकर इनामदार हे अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून, आईसुद्धा आजारी आहे. सततची नापिकी आणि खासगी सावकाराच्या कर्जामुळे चिंतातूर असलेल्या गणेशने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रिसोड तालुक्यातील ग्राम धोडप येथील ४५ वर्षीय शेतकरी भागवत दत्तात्रय बोरकर यांनी स्वत:च्या शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन २३ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता आत्महत्या केली. बोरकर यांच्याकडे ५ एकर जमीन होती, त्यावर अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७0 हजार रुपयांचे कर्ज होते. याशिवाय त्यांच्यावर सावकारी कर्जही होते. त्यांच्या पश्‍चात ३ मुली, १ मुलगा, पत्नी आणि मोठा आप्त परिवार आहे. तीन मुलींपैकी १ मुलगी लग्नाची असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. मुलीच्या लग्नाची चिंता, सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे या शेतकर्‍याने आत्महत्या केल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. कारंजा तालुक्यातील निंभा जहाँगीर येथील अल्पभूधारक शेतकरी विश्‍वास गोविंदराव उगले (५५) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. उगले यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती होती. त्यावर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १0 हजार रुपयाचे कर्ज होते. यावर्षी त्यांनी अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे कर्जाची मागणी केली होती; पण त्यांना कर्ज मिळाले नाही. गत दोन ते तीन वर्षापासून शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने आणि बँकेनेही कर्ज नाकारल्याने ते आर्थिक संकटात सापडले होते. परिस्थितीपुढे हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.