शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

चार उद्योजकांनी रोखले १५ कोटी

By admin | Updated: June 13, 2017 00:38 IST

हुंडीचिठ्ठीच्या सात दलालांसह गुंतवणूकदारांचा जीव टांगणीला

संजय खांडेकर। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : स्थानिक महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीमधील चार नामांकित उद्योजकांनी हुंडीचिठ्ठीचे १५ कोटी अचानक रोखल्याने अकोल्यातील बाजारपेठ हादरली आहे. या प्रकारामुळे शहरातील सात हुंडीचिठ्ठी दलालांसह गुंतवणूदारांचा जीव टांगणीला लागला आहे. अकोल्यातील डाळ आणि तेल उद्योगाचा राज्य आणि राज्याबाहेरदेखील दबदबा आहे. दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल अकोल्यातून होते. या उद्योगावर अनेक जोड व्यवसाय आणि हजारो कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे; मात्र शासनाच्या धोरणापायी यंदा तूर, ढेप, हरभरा आणि सोयाबीनचे भाव कमालीचे पडलेत. त्याचा परिणाम अकोल्यातील डाळ आणि ढेप उद्योगावरही मोठ्या प्रमाणात पडला. हुंडीचिठ्ठी दलालांकडून शेकडा दीड-दोन टक्के व्याजाने रकमा घेऊन एमआयडीसीतील उद्योजकांनी गुंतवणूक केली होती. तूर, ढेप, हरभरा आणि सोयाबीनचे भाव कमालीचे पडल्याने चार उद्योजकांना आता कोट्यवधींची रक्कम फिरविणे कठीण झाले आहे. त्यामुळे एमआयडीसीतील चार उद्योजकांनी १५ कोटी रुपयांची हुंडीचिठ्ठीची रक्कम रोखली. आधीच मंदी असलेल्या बाजारात कोट्यवधींची रक्कम अचानक थांबल्याने ही बाब वाऱ्यासारखी शहरात पसरली आहे. शहरातील सात हुंडीचिठ्ठी दलालांना रक्कम न मिळाल्याने दलालांसह ‘झीरो’ची गुंतवणूक करणाऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. गुंतवणूदारांमध्ये अकोल्यातील अनेक डॉक्टर, वकील आणि कोचिंग क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे. रक्कम झीरोची असल्याने याप्रकरणी पोलीस किंवा न्यायालयातही तक्रार करणे कठीण आहे. त्यामुळे दलाल आणि गुंतवणूकदारांनी आता उद्योजकांकडून रकमा मिळविण्यासाठी विविध युक्त्या सुरू केल्या आहेत.हॉटेल व्यावसायिकाने डुप्लेक्सचा केला उताराअडचणीत सापडलेल्या उद्योजकांनी रक्कम रोखली असली, तरी ती रक्कम देण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे दलाल आणि गुंतवणूकदारांच्या समन्वयाने विषय हाताळला जात आहे. गुंतवणूदारांच्या एका समूहाच्या संमतीने शहरातील नव्याने बांधलेल्या काही डुप्लेक्सचा उतारा एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या नावे करून घेतला आहे.तूर ४५०० वरून ३००० वर, ढेप २४०० वरून १६०० वर, हरभरा ६००० वरून ५२०० वर आणि सोयाबीन १८०० वरून १३०० वर आल्याने शेतकऱ्यांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. दरम्यान, शासनाने मोठ्या प्रमाणात डाळ आयात केली असून, निर्यातीवर प्रतिबंध घातले आहे. त्याचा जबर फटका अकोल्यातील परंपरागत डाळ आणि ढेप उद्योगावर पडला असून, चार उद्योजकांच्या माध्यमातून धोक्याची घंटा वाजू लागली आहे.