शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

कंपनी प्रतिनिधीच्या उपस्थितीत घेतले नमुने; शेतकरी अनभिज्ञ!

By admin | Updated: March 3, 2016 02:23 IST

वांझोटी केळी रोपे प्रकरण; कृषी विभागावर शेतक-यांचा संशय!

आकोट/आंबोडा: केळीची वांझोटी रोपे देऊन शेतकर्‍यांची फसवणूक केल्याप्रकरणी तालुका तक्रार निवारण समितीने कृषी तज्ज्ञांना सोबत घेत केळीची पाहणी करून नमुने घेतले. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या कंपनीच्या प्रतिनिधीला सोबत घेणार्‍या कृषी विभागाने मात्र फसवणूक झालेल्या शेतकर्‍यांना पूर्वसूचना देण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या भुवया उंचावल्या. अत्यंत घाईत आणि कंपनीच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत कोणते नमुने घेतले, अद्यापपर्यंंतही संबंधित कंपन्यांवर कारवाई का झाली, असे एक ना अनेक सवाल आता शेतकरी यानिमित्ताने उपस्थित करीत आहेत. कृषी अधिकारी-कंपनीचे प्रतिनिधी एकाच वाहनात! गुन्हा दाखल असलेल्या माऊली हायटेक नर्सरी या कंपनीचे प्रतिनिधी व कृषी अधिकारी, पोलीस स्टेशनला फिर्याद देणारे, अधिकारी हे शासकीय वाहनामध्ये बसून केळी पिकांचे नमुने घेण्याकरिता आंबोडा येथे आले होते.वांझोटी केळी रोपेप्रकरणी शेतकर्‍यांचे सवालवांझोटी केळी रोपेप्रकरणी शेतकर्‍यांनी आता काही सवाल उपस्थित केले आहेत. कंपन्यांना अभय कोणाचे? शेतकर्‍यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तक्रार निवारण समितीने तपासणी केली होती. शेतकर्‍यांनी फेब्रुवारी २0१५ मध्ये मे. वसंत बायोटेक ( पुसद) व इंद्रायणी अँग्रोटेक (पणज) यांच्याकडे अग्रीम रक्कम भरून केळी रोपांची मागणी नोंदविली; मात्र प्रत्यक्षात शेतकर्‍यांना माउली हायटेक नर्सरी या कंपनीची रोपे पुरविण्यात आली होती. कंपनीने बियाणे कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी रमेश रामचंद्र आकोटकर (संचालक- इंद्रायणी अँग्रोटेक), वसंत बायोटेक व माउली नर्सरीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रकरण कृषी आयुक्तांपर्यंंत पोहोचल्यानंतरही कृषी विभाग कंपन्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी पावले का उचलत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यापूर्वीच पाहणी का केली नाही? यापूर्वी कृषितज्ज्ञांच्या समितीने १२ फेब्रुवारी रोजी आंबोडा येथे केळीची पाहणी केली होती. केळीच्या वाणामध्ये उत्पादनक्षमता आढळून आली नसून, उत्पादनात ७0 घट झाल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे, असा निष्कर्ष तालुकास्तरीय कृषितज्ज्ञांच्या तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने अहवालात नोंदविला होता. आता पुन्हा पाहणी करून कृषितज्ज्ञ केव्हा अहवाल देणार आहेत, ही प्रक्रिया यापूर्वीच का पार पाडली नाही, असे प्रश्न शेतकर्‍यांमधून उपस्थित करण्यात येत आहेत.