शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

वन विभाग लावणार दीड लाखांवर झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 02:31 IST

१८८ हेक्टर क्षेत्रावर करणार रोपांची लागवड.

अतुल जयस्वाल /अकोला

     पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन विभागाकडून या वर्षीच्या पावसाळय़ात विविध परिक्षेत्रांमध्ये १ लाख ६२ हजार ९00 झाडे लावण्याचे नियोजन आहे. आगामी पावसाळय़ात १८८ हेक्टर क्षेत्रावर नव्याने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील जंगलांचे प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाकडून दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. अकोला वन विभागाने गतवर्षीच्या पावसाळय़ात २0७ हेक्टर क्षेत्रावर २ लाख ६४ हजार ८२४ रोपांची लागवड केली होती. यावर्षीच्या पावसाळय़ात वन विभागाकडून अकोला, पातूर, आलेगाव, बाश्रीटाकळी या परिक्षेत्रांमध्ये विविध योजनांतर्गत १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण, संयुक्त वनव्यवस्थापन, ओ.टी.एस.पी., भरीव वनीकरण तसेच कॅम्पा या योजनांतर्गत येळवण, देवळी, खानापूर, पाचरण, चिंचखेडा, पातूर जिराईत, चिखलवाल, सावरखेड या वनक्षेत्रांमध्ये १८८ हेक्टर क्षेत्रावर १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.