शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

वन विभाग लावणार दीड लाखांवर झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 02:31 IST

१८८ हेक्टर क्षेत्रावर करणार रोपांची लागवड.

अतुल जयस्वाल /अकोला

     पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन विभागाकडून या वर्षीच्या पावसाळय़ात विविध परिक्षेत्रांमध्ये १ लाख ६२ हजार ९00 झाडे लावण्याचे नियोजन आहे. आगामी पावसाळय़ात १८८ हेक्टर क्षेत्रावर नव्याने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील जंगलांचे प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाकडून दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. अकोला वन विभागाने गतवर्षीच्या पावसाळय़ात २0७ हेक्टर क्षेत्रावर २ लाख ६४ हजार ८२४ रोपांची लागवड केली होती. यावर्षीच्या पावसाळय़ात वन विभागाकडून अकोला, पातूर, आलेगाव, बाश्रीटाकळी या परिक्षेत्रांमध्ये विविध योजनांतर्गत १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण, संयुक्त वनव्यवस्थापन, ओ.टी.एस.पी., भरीव वनीकरण तसेच कॅम्पा या योजनांतर्गत येळवण, देवळी, खानापूर, पाचरण, चिंचखेडा, पातूर जिराईत, चिखलवाल, सावरखेड या वनक्षेत्रांमध्ये १८८ हेक्टर क्षेत्रावर १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.