शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

वन विभाग लावणार दीड लाखांवर झाडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2016 02:31 IST

१८८ हेक्टर क्षेत्रावर करणार रोपांची लागवड.

अतुल जयस्वाल /अकोला

     पर्यावरणाचा समतोल टिकून राहावा, यासाठी वृक्षांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील झपाट्याने कमी होत असलेली वृक्षसंपदा कायम राहावी व वृक्षांच्या संख्येत वाढ करावी, या उद्देशाने वन विभागाकडून या वर्षीच्या पावसाळय़ात विविध परिक्षेत्रांमध्ये १ लाख ६२ हजार ९00 झाडे लावण्याचे नियोजन आहे. आगामी पावसाळय़ात १८८ हेक्टर क्षेत्रावर नव्याने रोपांची लागवड करण्यात येणार आहे. बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. त्यामुळे तापमानवाढ, दुष्काळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पृथ्वीवरील जंगलांचे प्रमाण कायम राखणे गरजेचे आहे. यासाठी वन विभागाकडून दरवर्षी पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येते. अकोला वन विभागाने गतवर्षीच्या पावसाळय़ात २0७ हेक्टर क्षेत्रावर २ लाख ६४ हजार ८२४ रोपांची लागवड केली होती. यावर्षीच्या पावसाळय़ात वन विभागाकडून अकोला, पातूर, आलेगाव, बाश्रीटाकळी या परिक्षेत्रांमध्ये विविध योजनांतर्गत १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. निकृष्ट वनांचे पुनर्वनीकरण, संयुक्त वनव्यवस्थापन, ओ.टी.एस.पी., भरीव वनीकरण तसेच कॅम्पा या योजनांतर्गत येळवण, देवळी, खानापूर, पाचरण, चिंचखेडा, पातूर जिराईत, चिखलवाल, सावरखेड या वनक्षेत्रांमध्ये १८८ हेक्टर क्षेत्रावर १ लाख ६२ हजार ९00 रोपांची लागवड करण्यात येणार आहे.