शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

मूर्ख संमेलनाची सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:32 IST

अकोल्यात एकमेव होणारे संमेलन; यावर्षी निवडणूक व मतदान विषय राहणार.

अकोला, दि. ९- संपूर्ण राज्यात सुमारे ४५ वर्षांंपासून अविरत धूलिवंदनाच्या दिवशी आयोजित होणारे अकोल्यातील मूर्ख संमेलन सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. यावर्षी मूर्ख संमेलनात मतदान व निवडणूक हा विषय प्रामुख्याने राहणार आहे. स्थानिक कलाकार या मूर्ख संमेलनात आपली कला सादर करणार असल्याची माहिती मूर्ख संमेलनाचे मूर्खाधिराज विकास शर्मा यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत शर्मा यांनी ४५ वर्षांंची मूर्ख संमेलनाची परंपरा सांगितली. धूलिवंदन हा समाजाचा होळी पर्वावर येणारा सामाजिक उपक्रम आहे. या पर्वावर रंग खेळून उत्सव साजरा करतात; मात्र खोलेश्‍वर येथील स्वातंत्र्यसैनिक तथा नगरसेवक डॉ. प्रभुदयाल शर्मा यांनी आपले पत्रकार मित्र रामकिशोर श्रीवास यांना सोबत घेऊन ४५ वर्षांंपूर्वी धूलिवंदनाच्या रंगात्मक खेळाला छेद देत अकोल्यात मूर्ख संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली. त्या काळी याला ह्यअभिनव विधानसभाह्ण हे नाव देण्यात आले होते. धूलिवंदनाच्या सायंकाळी तेव्हाच्या कॉटन मार्केट येथे हे विचार व प्रबोधनाचे व्यंगात्मक विधानसभा अधिवेशन भरविले जात होते. त्यामध्ये आमदार, खासदार, मंत्री वर्गाचे व्यंगात्मक व मनोरंजनात्मक कामकाजाचे सादरीकरण करण्यात येत होते. सभा संपल्यावर पुढील वर्षाच्या धूलिवंदन कार्यक्रमापर्यंंत हे अधिवेशन तहकूब केल्या जात होते. कालांतराने हे कामकाज स्वराज्य भवनाच्या प्रांगणात आणण्यात येऊन त्याचे नामकरण ह्यमूर्ख संमेलनह्ण करण्यात आले. हे संमेलन अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तत्कालीन खासदार असगर हुसेन, भु.ना. मुखर्जी, बाबा कोथळकर, शंकरराव खंडारे, कामगार नेते मधुकरराव उतखडे, ओ.पी. मिश्रा, मामा पांडे, मोहनलाल छावछरिय, रामेश्‍वर अग्रवाल, बाजीराव पाटील, पन्नालाल शर्मा, बळीराम चापळे, देवराव लोटे, मीणा उदासी, लक्ष्मणसिंग जाजोरिया आत्माराम डोंगरे, प्रा.नरेंद्र पुरोहित तसेच कृषी कीर्तनकार महादेवराव भुईभार, शाहीर वसंतराव मानवटकर यांच्यासमवेत लोक प्रतिनिधी, कला साहित्य व शिक्षण क्षेत्रातील गणमान्यांचा सहभाग दरवर्षीची बाब झाली होती, असेही शर्मा यांनी सांगितले.