शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

१८ लाख लाेकांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:16 IST

अकाेला : जिल्ह्यातील १८ लाख लाेकांच्या अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे केवळ ६ अधिकारी असल्याची माहिती समाेर आली ...

अकाेला : जिल्ह्यातील १८ लाख लाेकांच्या अन्नसुरक्षेसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे केवळ ६ अधिकारी असल्याची माहिती समाेर आली आहे. १८ लाख लाेकसंख्या असताना अन्न विभागात ४ अन्न निरीक्षक तसेच औषध विभागात केवळ २ औषध निरीक्षक कार्यरत असल्याचे वास्तव आहे. यावरून जिल्ह्यातील १८ लाख लाेकांची अन्नसुरक्षा धाेक्यात आहे.

शहरासह जिल्ह्यातील हाॅटेल्समध्ये निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री हाेत असल्यास त्यावर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यरत आहे. यासाेबतच औषध दुकानांमध्ये हाेणारी हेराफेरी राेखण्यासाठी आणि एक्सापायरी डेट झालेल्या औषधी विक्री हाेत असेल तसेच विना फार्मासिस्ट औषध दुकान चालविण्यात येत असेल तर त्यांच्यावर औषध प्रशासन विभाग कारवाई करते. अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या विभागात मात्र गत अनेक वर्षांपासून मुनष्यबळ प्रचंड कमी झाले आहे. यावर शासनाने ताेडगा काढण्याची मागणीही वारंवार झाली आहे. मात्र काहीही झाले नसल्याचे वास्तव आहे.

जिल्ह्यातील हाॅटेल्स १५६३

जिल्ह्यातील मेडिकल्स ७९४

अन्न निरीक्षक ०४

औषध निरीक्षक ०२

जिल्ह्याची लाेकसंख्या १८ लाख

काेट

अन्न् व औषध प्रशासन विभागाकडून नियमित तपासणी करण्यात येते. तसेच दंडात्मक कारवाईही सुरू असते. ज्यांच्याकडे तपासणी केली त्यांचे नमुने चाचणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल आल्यानंतर न्यायालयात खटला दाखल करण्यात येताे.

- रावसाहेब वाकडे

अन्न निरीक्षक, अकाेला

११ चे झाले ४

जिल्ह्यात सुरुवातीला ११ अन्न निरीक्षक, तर ६ औषध निरीक्षक हाेते, मात्र ही संख्या वाढविण्याऐवजी कमी करण्यात आली आहे. आता जिल्ह्यात केवळ ४ अन्न निरीक्षक कार्यान्वित आहेत. त्यामुळे लाेकसंख्येच्या प्रमाणात अन्न निरीक्षकांची संख्या कमी असल्याचे वास्तव आहे. त्याचा परिणाम तपासणी तसेच इतर कामांवर हाेताे.

लाेकसंख्या वाढली, अधिकारी घटले

जिल्ह्याची लाेकसंख्या १० लाखांपेक्षा कमी असताना ११ अन्न निरीक्षक हाेते. तर आता १८ लाख लाेकसंख्या झाल्यानंतर अधिकारी वाढले तर नाहीच उलट त्यांची संख्या कमी करून केवळ ४ अन्न निरीक्षक ठेवण्यात आले आहे. तर असाच प्रकार औषध विभागातही असल्याचे समाेर आले आहे.