शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

अन्न प्रक्रीया निर्मिती, निर्यात अकोल्यातून शक्य -  सुनिता फाल्गुने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:51 IST

अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला.

-  संजय खांडेकरअकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर मुंबई आणि अकोला इंडस्ट्रीज असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक औद्योगीक वसाहतीत अन्न प्रक्रीय अद्योगासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्र मंगळवारी पार पडले. लोकमतने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.प्रश्न : अन्न प्रक्रीया निर्मिती आणि निर्यात अकोल्यातून कशी होईल ?उत्तर : मंगळवारच्या चर्चासत्रातून अकोल्यात अनेक तज्ज्ञ आणि प्रयोगशील कास्तकार असल्याचे समोर आले आहे. केसर आंबा, काजू, आवळा, मोसंबी, चीक्कू, रामफळ, सीताफळ, जांभूळ ,डाळींब, केळी आदी विविध फळांच्या पीकांचे उत्पादन अकोल्यात होते. या पीकांसोबत काही शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रीया साखळी निर्मिती सुरू केली आहे. अशा शेतकरी-उद्योजकांच्या उत्पादनाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या अनेक कंपन्यांची सांगड करून दिली तर अकोल्यातून निर्यात शक्य आहे.प्रश्न : महाराष्ट्र चेंबरचा प्रयोग उद्योजकांसाठी कि शेतकऱ्यांसाठी आहे ?उत्तर : शेतकरी आणि उद्योजक एकमेकांना पुरक कार्य करीत असतात. परंपरागत शेतीचे दिवस आता नाही. त्यामुळे अनंत समस्या निर्माण होत आहे. प्रगतशील शेती आणि अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास ते उद्योजक होऊ शकतात. किंवा उद्योजकांसाठी शेतकºयांचे उत्पादन महत्वाची कामगिरी पार पाडू शकते. शेतकरी आणि उद्योजक दोघांच्या एकंदरीत विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचा हा प्रयोग सुरू आहे.प्रश्न : योजनांचा लाभ मिळत नाही अनेकांना मिळत नाही कारण काय ?उत्तर : उद्योजक आणि शेतकºयांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तीत्वात येत आहे. मात्र अनेकदा या योजनांची माहिती तळागाळात जात नाही. शोषण सुरू होते. त्यासाठीच भविष्यात नॉलेज सेंटर उभारले जाणार आहे. यामुळे मानसिकतेत बदल तर होऊलच सोबतच नव्या बाजारपेठा आणि बदल शेतकरी आणि उद्योजकांना कळेल. अनेक उद्योगांमध्ये व्हॅल्यू एडीशन होत नसल्याने ते उद्योग बंद पडत आहे, त्यांना संजीवणी मिळेल.प्रश्न : कृषी आणि उद्योगसंदर्भातील तांत्रिक अडचणी कश्या दूर होतील ?उत्तर : कृषी आणि उद्योजकांना नेहमीच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. मातीचे परीक्षण, अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीचे नमुने यासाठी प्रयोगशाळांचे अहवाल आवश्यक असतात. अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रमुखांकडे जाऊन या सेवा आम्हाला द्या म्हणून शेतकºयांनी आवाज उठविला पाहिजे. तांत्रीकबाबी देखिल भविष्यात नॉलेज सेंटरच्या माध्यमातून यातील तज्ज्ञांना पाचारण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत.प्रश्न : सबसीडीच्या लाभासाठीच उद्योग उघडले जातात का ?उत्तर : अनेकजण केवळ सबसीडीच्या साठी उद्योग उघडतात, मात्र तसे सर्व नाही. अनेक उद्योजकांवर कर्जही होत असते. उद्योगांना उभारी देण्यासाठी महाराष्ट्र चेबरचे प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही अन्न प्रक्रीया साखळीचे नवे उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेत आहोत. त्यात शासनाची सबसीडी आॅक्सीजन देते.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत