शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अन्न प्रक्रीया निर्मिती, निर्यात अकोल्यातून शक्य -  सुनिता फाल्गुने  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 18:51 IST

अकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला.

-  संजय खांडेकरअकोला : प्रगतशील शेतकरी आणि उद्योजकांची चिकाटी अशीच राहिली तर अन्न प्रक्रीया निर्मिती निर्यात अकोल्यातून शक्य आहे, असा विश्वास महाराष्ट्र चेंबर कृषी प्रक्रीयेतील नाशिकच्या तज्ज्ञ सुनिता फाल्गुने यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रीकल्चर मुंबई आणि अकोला इंडस्ट्रीज असोसिएशच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक औद्योगीक वसाहतीत अन्न प्रक्रीय अद्योगासंदर्भात एक दिवसीय चर्चासत्र मंगळवारी पार पडले. लोकमतने त्यांच्याशी साधलेला विशेष संवाद.प्रश्न : अन्न प्रक्रीया निर्मिती आणि निर्यात अकोल्यातून कशी होईल ?उत्तर : मंगळवारच्या चर्चासत्रातून अकोल्यात अनेक तज्ज्ञ आणि प्रयोगशील कास्तकार असल्याचे समोर आले आहे. केसर आंबा, काजू, आवळा, मोसंबी, चीक्कू, रामफळ, सीताफळ, जांभूळ ,डाळींब, केळी आदी विविध फळांच्या पीकांचे उत्पादन अकोल्यात होते. या पीकांसोबत काही शेतकऱ्यांनी अन्न प्रक्रीया साखळी निर्मिती सुरू केली आहे. अशा शेतकरी-उद्योजकांच्या उत्पादनाला आंतराष्ट्रीय बाजारपेठ मिळू शकते. मुंबई, पुणे आणि नाशिकच्या अनेक कंपन्यांची सांगड करून दिली तर अकोल्यातून निर्यात शक्य आहे.प्रश्न : महाराष्ट्र चेंबरचा प्रयोग उद्योजकांसाठी कि शेतकऱ्यांसाठी आहे ?उत्तर : शेतकरी आणि उद्योजक एकमेकांना पुरक कार्य करीत असतात. परंपरागत शेतीचे दिवस आता नाही. त्यामुळे अनंत समस्या निर्माण होत आहे. प्रगतशील शेती आणि अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिल्यास ते उद्योजक होऊ शकतात. किंवा उद्योजकांसाठी शेतकºयांचे उत्पादन महत्वाची कामगिरी पार पाडू शकते. शेतकरी आणि उद्योजक दोघांच्या एकंदरीत विकासासाठी महाराष्ट्र चेंबरचा हा प्रयोग सुरू आहे.प्रश्न : योजनांचा लाभ मिळत नाही अनेकांना मिळत नाही कारण काय ?उत्तर : उद्योजक आणि शेतकºयांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक योजना अस्तीत्वात येत आहे. मात्र अनेकदा या योजनांची माहिती तळागाळात जात नाही. शोषण सुरू होते. त्यासाठीच भविष्यात नॉलेज सेंटर उभारले जाणार आहे. यामुळे मानसिकतेत बदल तर होऊलच सोबतच नव्या बाजारपेठा आणि बदल शेतकरी आणि उद्योजकांना कळेल. अनेक उद्योगांमध्ये व्हॅल्यू एडीशन होत नसल्याने ते उद्योग बंद पडत आहे, त्यांना संजीवणी मिळेल.प्रश्न : कृषी आणि उद्योगसंदर्भातील तांत्रिक अडचणी कश्या दूर होतील ?उत्तर : कृषी आणि उद्योजकांना नेहमीच तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो. मातीचे परीक्षण, अन्न प्रक्रीया साखळी निर्मितीचे नमुने यासाठी प्रयोगशाळांचे अहवाल आवश्यक असतात. अकोल्यातील कृषी विद्यापीठाच्या प्रमुखांकडे जाऊन या सेवा आम्हाला द्या म्हणून शेतकºयांनी आवाज उठविला पाहिजे. तांत्रीकबाबी देखिल भविष्यात नॉलेज सेंटरच्या माध्यमातून यातील तज्ज्ञांना पाचारण करून समस्या सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहेत.प्रश्न : सबसीडीच्या लाभासाठीच उद्योग उघडले जातात का ?उत्तर : अनेकजण केवळ सबसीडीच्या साठी उद्योग उघडतात, मात्र तसे सर्व नाही. अनेक उद्योजकांवर कर्जही होत असते. उद्योगांना उभारी देण्यासाठी महाराष्ट्र चेबरचे प्रयत्न सुरू आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही अन्न प्रक्रीया साखळीचे नवे उद्योग उभारण्याचा उपक्रम हाती घेत आहोत. त्यात शासनाची सबसीडी आॅक्सीजन देते.

टॅग्स :Akolaअकोलाinterviewमुलाखत