शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

चारा महागला, मुक्या जिवांचे बेहाल!

By admin | Updated: January 26, 2015 01:11 IST

पश्‍चिम व-हाडातील चित्र ; पशुपालकांनी पशुधन काढले विक्रीला.

ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा):पश्‍चिम वर्‍हाडात अपुर्‍या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाणी व चार्‍याची टंचाई आतापासूनच जाणवत असल्याने जनावरांचा चारा महागला आहे. दुष्काळाच्या या फटक्यामुळे जनावरांचे बेहाल होत आहेत. पश्‍चिम वर्‍हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात गतवर्षी गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, शेतकर्‍यांनी शेतात साठवून ठेवलेल्या चार्‍याची नासाडी झाली होती. शेतात असलेल्या सोयाबीन व इतर कुटाराला बुरशी लागून, ते कुटारही खराब झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने पश्‍चिम वर्‍हाडावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाचा फटका आता मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. शेतकर्‍यांकडे चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू झाली असून, पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची तारांबळ उडत आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१, वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्ह्यात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरे आहेत. मोठय़ा जनावराला सुमारे ७ किलो, तर छोट्या जनावराला ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो. पश्‍चिम वर्‍हाडातील पशुपालकांनी साठवून ठेवलेला चारा संपल्याने इतर जिल्ह्यांतून चारा खरेदी केला जात आहे. या चार टंचाईचा गैरफायदा घेत ज्याच्याकडे थोड्या बहुत प्रमाणात चारा शिल्लक आहे; त्यांनी चार्‍याच्या किंमती वाढवून ठेवल्या आहेत. परिणामी, अनेक पशुपालकांनी त्यांची जनावरे विक्रीस काढली आहेत.