शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:22 IST

हातरूण : खरीप हंगामात मोर्णा नदी व नाल्यांना पूर आल्याने हातरूण परिसरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली. हजारो एकर ...

हातरूण : खरीप हंगामात मोर्णा नदी व नाल्यांना पूर आल्याने हातरूण परिसरात शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरडून गेली. हजारो एकर क्षेत्रावरील पिकांची प्रचंड हानी झाली. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी, अशी मागणी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर यांनी केली आहे.

यावर्षी हातरूण परिसरात पेरणी उशिरा झाली. मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी पीक जगवले; मात्र जुलै महिन्यात आलेल्या मोर्णा नदी व नाल्याच्या पुराने शेतातील उभ्या पिकाला तडाखा बसला. नदी आणि नाल्याच्या पुराने शेतात असलेली पिके पाण्याखाली गेली. शेती खरडून गेली असून शेतात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सतत संकटाचा सामना करणारा शेतकरी आर्थिक अडचणीत असताना शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी भाजप नेते नारायणराव गव्हाणकर, माजी पंचायत समिती सदस्य मंजूर शाह, माजी सर्कलप्रमुख गजानन नसुर्डे, बंडूभाऊ गावंडे, प्रवीण बोर्डे, राजेश काळे, गणेश आढे, संजय घंगाळे, अमित काळे, सुधाकर बोर्डे, संतोष गव्हाळे यांनी केली आहे.

------------

मोर्णा नदीला पूर आला की शेतातील पिकाला पुराचा तडाखा बसतो. पुलावरून पुराचे पाणी वाहते. त्यामुळे रस्ता बंद होतो. यावर्षी आठवडी बाजारापर्यंत पूर आला होता. पुरामुळे पिकाची मोठी हानी झाली. मोर्णा नदीचे खोलीकरण तत्काळ करण्याची गरज आहे.

- वाजीद खान, सरपंच, हातरूण

----------------

पावसामुळे हातरूण परिसरात रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे दुर्दशा झालेले रस्ते अपघातास निमंत्रण देणारे ठरत आहेत. रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वाहन घसरण्याच्या घटना घडत आहेत. दुर्दशा झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

- महेश बोर्डे, सरपंच, शिंगोली

---------

या भागात नुकसान

हातरूण, दुधाळा, शिंगोली, मालवाडा, मंडाळा, लोणाग्रा, हातला, मांजरी, अंदुरा भाग एक आणि अंदुरा भाग दोन परिसरात पूर व पावसामुळे शेतजमिनीवरील पिकांची मोठी हानी झाली आहे. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. पुरामुळे जमीन खरडून जाऊन शेतात मोठ मोठे खड्डे पडले आहेत. सर्वत्र गाळ साचलेला असल्याने या शेतात दुबार पेरणी करता येत नाही. मागील तीन ते चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, नापिकी यामुळे शेतकऱ्यांसमोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.