शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचा मुहूर्त टळल्यास पाच हजारांचा दंड!

By admin | Updated: May 11, 2015 02:09 IST

लेवा पाटीदार समाजाचा निर्णय; चांगल्या निर्णयास मिळाली समाजमान्यता.

हनुमान जगताप ./मलकापूर : विवाह सोहळा आयोजित करण्यापूर्वीच मुहूर्त काढला काढला. तारीख आणि वेळेनुसार हा मुहूर्त सर्वांसाठी उत्सुकता आणि उत्कंठा वाढविणारा असतो. मात्र, शहरांसह ग्रामीण भागांत मुहूर्तावर विवाह लावले जात नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे. म्हणूनच विवाह नियोजित वेळेतच व्हावे, यासाठी लेवी पाटीदार समाजाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार विवाह मुहूर्तावर अर्थात वेळेवर न लावले गेल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वदूर लग्न समारंभ सुरू आहेत. मात्र त्यात मुहूर्ताची पर्वा कुणालाही नाही असे बर्‍याच ठिकाणी दिसते. त्यात पाहुण्यांची परवड न सांगण्यासारखीच, अशा परिस्थितीवर मात करणारी अभिनव परंपरा मलकापूर येथील भ्रातृमंडळातर्फे चार वर्षांपासून राबविली जात आहे. विवाहास विलंब झाल्यास ५ हजाराचा दंड आकारण्यात येत असून, त्याला समाजाची मान्यता मिळाली आहे. स्थानिक लेवा पाटीदार समाजाच्या भ्रातृमंडळाने त्यांच्या अखत्यारीतील विवाह सोहळ्यासाठी काही अटी व शर्ती लागू केल्या आहेत. अर्थात महाराष्ट्र राज्य लेवा पाटीदार महासंघाच्या तशा सूचना आहेत. त्यानुसारच गेली तीन ते चार वर्षे अंमलबजावणी सुध्दा होत आहे. चुकीच्या चालीरितींना आळा बसावा, विवाह समारंभ चांगल्या पध्दतीने पार पडावे हा त्या मागील उद्देश असल्याची प्रतिक्रिया स्थानिक भ्रातृमंडळाचे सचिव एस.टी. पाटील यांनी लोकमतशी बोलताना दिली. भ्रातृमंडळाच्या अखत्यारीत होणार्‍या विवाह सोहळ्यात निर्धारीत राशी आकारली जाते. मात्र लग्न समारंभ ठरल्या मुहूर्तावर न झाल्यास संबंधितांना ५ हजाराच्या दंडाची तरतूद केलेली आहे. या निर्णयाला संपूर्ण लेवा पाटीदार समाजाची मान्यता असून, दंड आकारणी करताना समाजातील गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव नाही हे विशेष ! दरम्यान, ५ हजारांचा दंड ही बाब सहज वाटत असली तरी आमची विनाकारण बदनामी होऊ नये समाजात प्रतिष्ठेला ठेच लागू नये या भितीपोटी स्थानिय भ्रातृमंडळात विवाह समारंभ वेळेवरच लागत असल्याची परंपरा गेली चार वर्षापासून जोपासली जात असून लेवा समाजाचा त्यात सहभाग आणि पाठींबा आदर्श घेण्यासारखा असाच आहे.