शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

पाच एकरातील हरभरा गंजीला आग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:35 IST

हातरुण: पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटे ...

हातरुण: पाच एकर शेतातील हरभऱ्याच्या गंजीला आग लावण्यात आल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याची घटना शनिवारी पहाटे हातरुण शेतशिवारात घडली. घटनास्थळी उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी भेट देऊन पाहणी केली.

हातरुण गावालगत शेतकरी शेख बिस्मिल्ला मोहम्मद हनिफ यांची ५ एकर शेती आहे. या शेतात त्यांनी हरभऱ्याची पेरणी केली होती. त्यानंतर शेतातील हरभऱ्याची सोंगणी केली. तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हातरुण परिसरात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने सोंगणी केलेला हरभरा जमा करून शेतात ताडपत्रीने झाकून ठेवला होता. शनिवारी पहाटेच्या सुमारास हरभरा गंजीमधून धूर निघत असल्याचे दिसून आले. वीस ते पंचवीस क्विंटल हरभरा आगीत जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या पिकाची राखरांगोळी झाल्याने शेतकऱ्याचे दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हरभरा गंजीला आग लागल्याची माहिती मिळताच उरळ ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी सरपंच वाजिद खान, माजी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष नासीर खान, मोहम्मद हनिफ, शेतकरी शेख बिस्मिल्ला, नीलेश बेंडे हजर होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

●●●