शहरं
Join us  
Trending Stories
1
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
2
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
3
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
4
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
5
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
6
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
7
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
8
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
9
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
10
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
11
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
12
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
14
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
15
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
16
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
17
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
18
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
19
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
20
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न

दुष्काळाचा पहिला ट्रिगर तीन तालुक्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:25 IST

अकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत  दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनव्या निकषांनुसार अहवाल तयार अकोला, पातूर, अकोटचा समावेश

राजेश शेगोकार। लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शासन स्तरावर दुष्काळ जाहीर करण्याचे परिमाण व परिभाषा बदलली आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत सरासरीपेक्षा ७५ टक्के पाऊस कमी असल्याने अकोल्यातील अकोला, पातूर व अकोट या तीन तालुक्यांत  दुष्काळाचा प्रथम ट्रिगर लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हा दुष्काळ देखरेख समितीद्वारा असा अहवाल आयुक्त कार्यालय स्तरावर पाठविण्यात आला असून, या तीन तालुक्यांमध्ये दुष्काळाचा पहिला टप्पा घोषित होण्याचे संकेत आहेत.शासन जाहीर करीत असलेली खरिपाची हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी आणि कमी उत्पन्नावर दुष्काळ जाहीर करण्याची पद्धत होती. यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. केंद्र शासनाने आता दुष्काळ व्यवस्थापन संहिता २0१६ मध्ये दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती ठरवून दिली आहे. खरीप २0१७ पासून या निकषानुसारच दुष्काळ जाहीर करण्याचे निर्देश शासनाने ७ ऑक्टोबर रोजी दिले आहेत. त्यानुसार  दुष्काळी परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी प्रामुख्याने पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदा आद्र्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण, सत्यापन विचारात घेऊन समित्यांचे गठन करण्यात आले आहे. यामध्ये पर्जन्यमानाशी निगडित निर्देशांक हा पहिलाच घटक आहे. या घटकामुळेच अकोल्यातील तीन तालुक्यांत दुष्काळाचा पहिला टप्पा लागू होणार आहे. 

निर्देशांकानुसार पावसाची सरासरी कमी- दुष्काळासंदर्भात हा अनिवार्य निर्देशांक आहे. यामध्ये पर्जन्यमानाचे विचलन, पर्जन्यमानातील खंड तसेच जून व जुलै महिन्यात एकूण सरासरी पर्जन्याच्या ५0 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असल्यास व जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी पर्जन्यमान ७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास दुष्काळाची प्रथम कळ लागू होणार आहे. - पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार अकोल्यात ३ ते १६ जुलै व ८ ऑगस्ट ते १८ ऑगस्टपर्यंत पावसाने दडी मारली होती. अकोटात ३ ते १२ जुलै व १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट व पातूरमध्ये ५ ते १३ जुलै व ५ ते १४ ऑगस्टपर्यंत पावसाचा खंड होता. साधरणपणे अशीच स्थिती इतर तालुक्यांची असली, तरी अकोला, अकोट व पातूर या तालुक्यात पावसाची सरासरी ही ७0 टक्क्यांच्या आत आहे. त्यामुळे हे तीन तालुके दुष्काळाच्या पहिल्या टप्यासाठी पात्र ठरत आहेत.

असे आहेत निकष दुष्क ाळाची तीव्रता ठरविण्यासाठी पर्जन्यमानासोबतच प्रभावदर्शक निर्देशांक यामध्ये वनस्पतीशी निगडित निर्देशांक, सामान्य फरक आद्र्रता निर्देशांक, वनस्पती स्थिती निर्देशांक, लागवडीखालील क्षेत्र, मृदा आद्र्रता निर्देशांक तसेच जलविषयक निर्देशांक यामध्ये भूजल पातळी निर्देशांकाचा समावेश आहे.