शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

पहिल्या फेरीतील प्रवेशास सोमवारपर्यंत मुदतवाढ!

By admin | Updated: July 15, 2017 01:33 IST

केंद्रीय समितीचा निर्णय : अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केंद्रीय पद्धतीने अकरावी विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, १४ जुलै रोजी प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख होती; परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नसल्यामुळे तसेच पालकांच्या विनंतीवरून विद्यार्थ्यांच्या हितासाठी पहिल्या फेरीतील प्रवेशाला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता सोमवार, १७ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे. केंद्रीय प्रवेश समितीच्या डॉ. सुभाष भडांगे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या बैठकीत हा विद्यार्थी हिताचा निर्णय घेण्यात आला.पहिल्या टप्प्यात इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ४,0६३ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार मंगळवारपासून कनिष्ठ महाविद्यालयांमधील विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना पसंतीक्रमानुसार दिलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. यादीमध्ये दिलेल्या पसंतीक्रमानुसार आणि पारदर्शक पद्धतीने प्रवेश प्रक्रिया समितीने विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालये उपलब्ध करून दिली आहेत; परंतु काही कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश क्षमता आणि गुणवत्तेनुसार जागा उपलब्ध केल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांचा हिरमोड झाला असून, त्यांनी शुक्रवारपर्यंत प्रवेश निश्चित केला नव्हता. यामुळे केंद्रीय प्रवेश समितीने शुक्रवारी सायंकाळी तातडीची बैठक बोलावून प्रवेश प्रक्रियेला सोमवार, १७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. कनिष्ठ महाविद्यालयांनी १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पहिल्या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तसेच व्यवस्थापन कोट्यातील प्रवेशही याच दिवशी निश्चित करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी मंगळवार, १८ जुलैपर्यंत त्यांच्याकडे झालेल्या प्रवेशांची माहिती आर.एल.टी. महाविद्यालय येथे सकाळी ११ वाजता सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.दुसऱ्या फेरीकरिता बदलदुसऱ्या फेरीकरिता प्रवेश अर्ज स्वीकारण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. आता विद्यार्थी दुसऱ्या फेरीकरिता सोमवार, १७ जुलै दुपारी ३ ते ५ या वेळेपर्यंत अर्ज सादर करू शकतात. दुसऱ्या फेरीची प्रवेश यादी २० जुलै रोजी सकाळी ११ वाजता आर.एल.टी. महाविद्यालय येथे प्रसिद्ध करण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांना २० ते २२ जुलै रोजी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे.