शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

‘गॉडफादर’शिवाय पहिलीच निवडणूक!

By admin | Updated: September 17, 2014 02:27 IST

इच्छुकांची फरपट: उमेदवारांना भासणार दिवंगत नेत्यांची उणीव.

अजय डांग/ अकोलाशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि भाजपचे केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यासारख्या दिग्गज नेत्यांच्या पश्‍चात होणारी विधानसभेची यावेळची पहिलीच निवडणूक. या दिवंगत लोकनेत्यांची आपआपल्या पक्षात सर्मथकांची फौज आहे. या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षाला ज्याप्रमाणे भासत आहे, त्याचप्रमाणे उमेदवारीसाठी झगडणार्‍या इच्छुकांनाही भासत आहे. बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यासारखे महाराष्ट्रातील लोकनेते गत वर्ष-दोन वर्षात काळाच्या पडद्याआड गेले. आपल्या हयातीत राजकीय उंची गाठलेल्या या लोकनेत्यांना मानणारी सर्मथकांची फौज अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आहे. पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार्‍या या लोकनेत्यांना महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले. भाजप नेते गोपीना थ मुंडे पक्षावर नाराज असताना, त्यांच्या सर्मथनार्थ महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे किंवा सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर पेटून उठणारे शिवसैनिक ही त्यांच्या लोकप्रियतेची पोचपावती होती. अशा या लोकनेत्यांची उणीव त्या-त्या पक्षांना पदोपदी भासत आहे. या सर्वमान्य नेत्यांच्या पश्‍चात खरी फरपट होत आहे ती उमेदवारांची. निवडणूक आली की, पक्षाशी संबंध नसलेले कार्यकर्ते एका रात्रीतून नेते होतात आणि उमेदवारीसाठी पक्षनेत्यांकडे मोर्चेबांधणी करतात. पक्षासाठी अहोरात्र झटलेल्या कार्यकर्त्यांवर मात्र अनेकदा अन्याय होतो. अशा अनेक कार्यकर्त्यांच्या पदरी त्यांच्या गॉडफादरच्या पश्‍चात निराशा आल्याचे पाहावयास मिळत आहे. गटातटाचे राजकारण प्रत्येक पक्षात फोफावले आहे. या राजकारणाचा बळी हे प्रामाणिक कार्यकर्ते ठरत आहेत. महाराष्ट्राची नाडी ठाऊक असलेल्या या लोकनेत्यांच्या पश्‍चात पक्ष थांबला नाही, कुणी तरी त्यांची धुरा सांभाळलीच; पण त्यांना साहेबांची सर येत नाही असे अनेक जुणे-जाणते कार्यकर्ते खिन्न मनाने बोलून दाखवतात.