शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

आधी तर कॉलच लागत नाही, लागला तर आवाज येत नाही!

By atul.jaiswal | Updated: November 11, 2021 10:40 IST

Mobile Network Problems : वारंवार नेटवर्क खंडित होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, रिंग न वाजणे, अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत.

ठळक मुद्देखासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क विस्कळित नेट कनेक्टिव्हिटीच्याही समस्या वाढल्या

-अतुल जयस्वाल

अकोला : एकीकडे डिजिटल इंडियाचे नारे बुलंद होत असताना, गत काही महिन्यांपासून काही खासगी मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क वारंवार विस्कळीत होत असल्याने अकोलेकरांच्या समस्या वाढल्या आहेत. कॉल कनेक्ट न होणे, कनेक्ट झाला, तर ज्याला कॉल केला आहे, त्या व्यक्तीचा आवाज न येणे किंवा आपला आवाज त्यांच्यापर्यंत न पोहोचणे, अचानक नेटवर्क गायब होणे, डेटा कनेक्टिव्हिटी खंडित होणे, अशा विविध तक्रारी सध्या काही खासगी कंपन्यांची सेवा घेणाऱ्या मोबाइलधारकांना भेडसावत आहेत. दुरसंचार क्षेत्रात क्रांती होऊन अनेक खासगी कंपन्या बाजारात आल्याने स्पर्धा वाढली व परिणामी मोबाइल सेवा अधिक दर्जेदार व स्वस्त होत गेली. त्यामुळे मोबाइलधारकांची संख्या कमालीची वाढली असून, प्रत्येकाच्या हातात मोबाइल फोन आला. अकोला जिल्ह्यासह शहरात विविध मोबाइल सेवा देणाऱ्या कंपन्या कार्यरत असून, त्यांचे मोठे नेटवर्क आहे. ग्राहकांना दर्जेदार व चांगली सेवा देण्यासाठी मोबाइल कंपन्यांनी शहरात फायबर ऑप्टिक केबलचे जाळे टाकले. यामुळे सेवा अधिक चांगली होणे अपेक्षित होते. तथापि, गत काही महिन्यांपासून काही खासगी मोबाइल कंपन्यांची सेवा अत्यंत सुमार दर्जाची झाली असून, वारंवार नेटवर्क खंडित होणे, नेटवर्क असतानाही कॉल न लागणे, रिंग न वाजणे, अचानक कॉल डिस्कनेक्ट होणे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. भरमसाठ सेवा शुल्क घेणाऱ्या कंपन्यांकडून तक्रारींची निरसण होत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त झाले आहेत.

 

फ्रिक्वेन्सीबाबत हेरफेर?

भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांना विशिष्ट फ्रिक्वेन्सी बहाल केली असून, या निश्चित फ्रिक्वेन्सीनुसारच सेवा देणे बंधनकारक आहे. खासगी कंपन्या मात्र उच्च फ्रिक्वेन्सीचा वापर करतात व यामुळेच कॉल ड्रॉप, नेटवर्क खंडित होणे यासारख्या समस्या उद्वभण्याची शक्यता असते, असे दुरसंचार क्षेत्रातील एका तज्ज्ञ व्यक्तीने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर सांगितले.

ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा

कोरोना संसर्गामुळे सध्या शहरातील प्राथमिक शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षणावरच मदार आहे. क्लास सुरू असताना अनेकदा इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित होते. परिणामी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

 

तक्रार करावी तरी कुठे?

सरकारी भ्रमणध्वनी सेवा पुरविणाऱ्या कंपनीची तक्रार असेल, तर त्यासाठी मंच उपलब्ध आहे. खासगी कंपन्यांच्या सेवेबद्दल तक्रार कुठे करावी, असा प्रश्न मोबाइलधारकांना पडला आहे. कस्टमर केअरला फोन केला, तर तिकडेही समाधानकारक उत्तर मिळत नाही.

 

पोर्टेबिलिटी करणाऱ्यांची संख्या वाढली

एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीची सेवा घेण्यासाठी पोर्टेबिलिटीचा पर्याय आहे. यामध्ये मोबाइल क्रमांक कायम राहतो; परंतु सेवा देणारी कंपनी बदलली जाते. काही कंपन्यांची सेवा पुर्वीसारखी दर्जेदार नसल्याचे कारण पुढे करत अनेक जण पोर्टेबिलिटीचा पर्याय वापरत आहेत.

मोठमोठे टाॅवर शोभेसाठीच आहेत काय?

खासगी कंपन्यांचे मोठमोठे टॉवर आहेत; परंतु दिव्याखाली अंधार या म्हणीप्रमाणे टॉवरखालीच नेटवर्क नाही, अशी परिस्थिती आहे. घरातून तर फोनच लागत नाही. फोन आला की बाहेर जावे लागते. इंटरनेट कनेक्टिव्हिटीही मिळत नाही.

-कृष्णा केदार, मोबाइलधारक, अकोला

 

आमच्या भागात नेहमीच नेटवर्क विस्कळीत असते. कधी- कधी नेटवर्क असतानाही फोन लागत नाही किंवा येतही नाही. गत दोन- तीन महिन्यांपासून ही समस्या वाढली आहे. मुलांच्या ऑनलाइन शिक्षणाचाही यामुळे खोळंबा होत आहे.

 

-अस्मिता देशमुख, मोबाइलधारक, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाMobileमोबाइल