शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
2
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
3
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
4
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
5
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
6
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
7
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
8
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
9
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
10
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
11
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
12
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
13
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
14
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
15
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
16
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
17
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
18
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
19
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
20
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव

उत्तुंग समाजनिर्मितीकरिता आधी स्वत:ला बदलायला हवे- स्वरूपानंद सरस्वती

By admin | Updated: April 24, 2015 02:09 IST

अकोला येथे आदि शंकराचार्य जयंती महोत्सव.

अकोला : बाराशे वर्षांपूर्वी एक युगपुरुष या भारतभूमीत जन्माला आला. ती व्यक्ती म्हणजे साक्षात आदि शंकराचार्य. राष्ट्रनिर्मितीचं कार्य करीत असताना, त्यांनी केवळ व्यक्ती नाही, तर संपूर्ण समाज बदलण्याकरिता एक आधार म्हणून धर्म दिला. धर्म म्हणजे केवळ पोथी-पुराण किंवा पूजा-अर्चा करणे नव्हे. धर्म हा केवळ एक व्यक्ती किंवा समाजापुरता र्मयादित नाही, तर धर्म हा आचार-विचार आणि समाजाला उन्नतीकडे नेणारा असल्याने आधी आपण स्वत:ला बदलायला हवे. समाजाला जर देवत्वापर्यंत न्यायचे असेल, तर आधी स्वत:तील पशुत्व नष्ट करायला हवं. उत्तुंग समाज निर्माण करायचा असेल, तर स्वत:तील पशू नष्ट व्हायला हवा, असे प्रतिपादन परमपूज्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी केले. मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार, २३ एप्रिल रोजी आयोजित आदि शंकराचार्य जयंती महोत्सवाप्रसंगी ते बोलत होते. सनातन वैदिक तत्त्वज्ञानाच्या आचरणातून आजच्या पाश्‍चात्त्य भोगवादी जीवनपद्धतीमधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधायला हवा. तेव्हाच कुठले जगद्गुरू आदि शंकराचार्यांना अपेक्षीत असलेल्या सशक्त आणि सर्मथ राष्ट्राची निर्मिती होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न होणे गरजे असल्याने या कार्यात पश्‍चिम विदर्भातील जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यासपीठावर माताजी स्वामी स्थितप्रज्ञानंद सरस्वती, शारदानंद महाराज, खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा, माजी आमदार विजयराव जाधव, कार्याध्यक्ष नाना कुळकर्णी व संयोजक राजू बियाणी, प्राचार्य एस. डी. देशमुख व इतर गणमान्य व्यक्ती उपस्थित होत्या. संचालन प्राचार्य अतुल बकाल व प्राची पिंपरकर यांनी केले. आभार छाया देशमुख यांनी मानले. मदनलालजी खंडेलवाल व गोपाल खंडेलवाल यांच्या प्रमुख नेतृत्वात पार पडलेल्या कार्यक्रमाला शेकडो नागरिक उपस्थित होते.