शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: वडाळा, हिंदमाता, दादर टीटीसह मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले; वाहतूक मंदावली
2
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
3
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
4
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
5
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
6
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
7
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
8
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
9
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल
10
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
11
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
12
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
13
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
14
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
15
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
16
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
17
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
18
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
19
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
20
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू

रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र रुळावर!

By admin | Updated: March 6, 2017 02:27 IST

खोडसाळपणाचा संशय; बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल.

अकोला, दि. ५- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र काढून ते रुळावर टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली. रेल्वे रुळावर घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी जीआरपीने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. रविवारी पहाटे या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निशामक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले. सदर अगिशामक यंत्र रुळाच्या बाजूला पडल्याने ते पंर झाले. काही वेळातच यामधील द्रवाची गळती सुरू झाली. या परिसरात काही प्रमाणात धूर निघाल्याने नागरिकांनी या यंत्राचा स्फोट झाल्याची अफवा केली; मात्र या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या सर्व यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर अग्निशामक यंत्र हे रेल्वे रुळाच्या बाजूला पंर झाल्याने त्यामधील वायूची गळती झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र इंजीनमधून काढून बाहेर फेकण्यात आले. या यंत्राच्या मुख्य बाजूला धक्का पोहोचल्याने ते पंर होऊन वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याच्या तशाच अनेक प्रकारच्या अफवा करण्यात आल्या; मात्र यंत्रणेद्वारे तपासणी केली असता हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. काहीही असले तरी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.विजयकांत सागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला यंत्रणांकडून तपासणीया घटनेची तत्काळ पाहणी करून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक नाशक पथक, श्‍वानपथकाद्वारे तपासणी करण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत हा प्रकार घातपाताचा नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा आली तरी तपास गाभीर्ंयाने सुरू आहे. अग्नीशामक यंत्र फेकल्याने त्यामधून वायुगळती झाली आणि या वायूच्या गळतीमुळे काही प्रमाणात धूर निर्माण झाला होता.