शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र रुळावर!

By admin | Updated: March 6, 2017 02:27 IST

खोडसाळपणाचा संशय; बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल.

अकोला, दि. ५- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र काढून ते रुळावर टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली. रेल्वे रुळावर घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी जीआरपीने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. रविवारी पहाटे या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निशामक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले. सदर अगिशामक यंत्र रुळाच्या बाजूला पडल्याने ते पंर झाले. काही वेळातच यामधील द्रवाची गळती सुरू झाली. या परिसरात काही प्रमाणात धूर निघाल्याने नागरिकांनी या यंत्राचा स्फोट झाल्याची अफवा केली; मात्र या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच श्‍वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या सर्व यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर अग्निशामक यंत्र हे रेल्वे रुळाच्या बाजूला पंर झाल्याने त्यामधील वायूची गळती झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र इंजीनमधून काढून बाहेर फेकण्यात आले. या यंत्राच्या मुख्य बाजूला धक्का पोहोचल्याने ते पंर होऊन वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याच्या तशाच अनेक प्रकारच्या अफवा करण्यात आल्या; मात्र यंत्रणेद्वारे तपासणी केली असता हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. काहीही असले तरी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.विजयकांत सागर,अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला यंत्रणांकडून तपासणीया घटनेची तत्काळ पाहणी करून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक नाशक पथक, श्‍वानपथकाद्वारे तपासणी करण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत हा प्रकार घातपाताचा नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा आली तरी तपास गाभीर्ंयाने सुरू आहे. अग्नीशामक यंत्र फेकल्याने त्यामधून वायुगळती झाली आणि या वायूच्या गळतीमुळे काही प्रमाणात धूर निर्माण झाला होता.