शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

हरभरा घोटाळ्यासाठी विक्रेत्यांचे महाबीजकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:21 IST

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.

ठळक मुद्देमाहितीच न दिल्याने बियाण्याची खुल्या बाजारात विक्री केल्याचा  पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी कडधान्य बियाणे  अनुदानावर देण्यात आले. त्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाणे  पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या  उत्पादकांना राज्याच्या कृषी विभागाने आदेश दिले. त्यानुसार  सर्वाधिक बियाणे पुरवठा करणार्‍या महाबीजने २0 सप्टेंबरपूर्वी वि तरकांना हरभरा बियाणे वाटप केले. या बियाण्यासाठी शासनाकडून  अनुदान मिळणार आहे, अशा सूचना त्यावेळी दिल्याच नसल्याचे वि तरक आणि कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. नेमक्या याच त्रुटीचा  फायदा घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून वितरक, केंद्र  संचालकांकडून सुरू आहे. एकीकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या  बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी वितरक या  गोंधळाची जबाबदारी महाबीजच्या गळ्यात टाकत आहेत, तर  महाबीजनेही त्या सर्वांनाच पाठीशी घालण्याची भूमिका अगदी  सुरुवातीपासूनच घेतल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत  आहे. त्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मिळू  न देता मधल्या दलालांनीच लाटल्याचे हे उत्तम उदाहरण लगतच्या  काळात पुढे आले आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशावरून जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशीत मोठा  घोटाळा उघड झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र  संचालकांनी हरभरा बियाण्याचा केलेला अपहार उघड झाला. त्यापैकी १४६ कृषी केंद्र संचालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास  अधिकारी एच.जी. ममदे यांनी नोटीस बजावल्या. त्यापैकी अनेकांनी  स्वत:च, तर काहींनी एकाच वकिलामार्फत स्पष्टीकरण सादर  केल्याची माहिती आहे. त्यामध्ये २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २0१६ या  काळात महाबीजने वितरकांना त्यांच्याकडून कृषी सेवा केंद्रांना  मिळालेले बियाणे अनुदानित दरावर असल्याची माहितीच नव्हती,  त्यामुळे ते ठरलेल्या दराने विक्री करण्यात आले. ती किंमत खुल्या  बाजारातील भावाप्रमाणे होती. त्यातून शेतकर्‍यांना अनुदानाचा कोण ताही फायदा झालेला नाही. दरम्यान, काहींनी बाजारात वाढलेल्या  प्रचंड दराचा लाभ घेण्यासाठी बियाणे टंचाई भासवून खुल्या बाजारात  विक्रीही केली. काहींनी दलालामार्फत उखळ पाढरे करून घेतले.  आता कारवाईच्या वेळी जबाबदारी झटकून शासनाची, जनतेची  बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. त्याचे  उदाहरण वितरक, कृषी केंद्र संचालकांच्या स्पष्टीकरणातून दिसून येत  आहे. -