शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

हरभरा घोटाळ्यासाठी विक्रेत्यांचे महाबीजकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:21 IST

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.

ठळक मुद्देमाहितीच न दिल्याने बियाण्याची खुल्या बाजारात विक्री केल्याचा  पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी कडधान्य बियाणे  अनुदानावर देण्यात आले. त्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाणे  पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या  उत्पादकांना राज्याच्या कृषी विभागाने आदेश दिले. त्यानुसार  सर्वाधिक बियाणे पुरवठा करणार्‍या महाबीजने २0 सप्टेंबरपूर्वी वि तरकांना हरभरा बियाणे वाटप केले. या बियाण्यासाठी शासनाकडून  अनुदान मिळणार आहे, अशा सूचना त्यावेळी दिल्याच नसल्याचे वि तरक आणि कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. नेमक्या याच त्रुटीचा  फायदा घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून वितरक, केंद्र  संचालकांकडून सुरू आहे. एकीकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या  बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी वितरक या  गोंधळाची जबाबदारी महाबीजच्या गळ्यात टाकत आहेत, तर  महाबीजनेही त्या सर्वांनाच पाठीशी घालण्याची भूमिका अगदी  सुरुवातीपासूनच घेतल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत  आहे. त्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मिळू  न देता मधल्या दलालांनीच लाटल्याचे हे उत्तम उदाहरण लगतच्या  काळात पुढे आले आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशावरून जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशीत मोठा  घोटाळा उघड झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र  संचालकांनी हरभरा बियाण्याचा केलेला अपहार उघड झाला. त्यापैकी १४६ कृषी केंद्र संचालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास  अधिकारी एच.जी. ममदे यांनी नोटीस बजावल्या. त्यापैकी अनेकांनी  स्वत:च, तर काहींनी एकाच वकिलामार्फत स्पष्टीकरण सादर  केल्याची माहिती आहे. त्यामध्ये २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २0१६ या  काळात महाबीजने वितरकांना त्यांच्याकडून कृषी सेवा केंद्रांना  मिळालेले बियाणे अनुदानित दरावर असल्याची माहितीच नव्हती,  त्यामुळे ते ठरलेल्या दराने विक्री करण्यात आले. ती किंमत खुल्या  बाजारातील भावाप्रमाणे होती. त्यातून शेतकर्‍यांना अनुदानाचा कोण ताही फायदा झालेला नाही. दरम्यान, काहींनी बाजारात वाढलेल्या  प्रचंड दराचा लाभ घेण्यासाठी बियाणे टंचाई भासवून खुल्या बाजारात  विक्रीही केली. काहींनी दलालामार्फत उखळ पाढरे करून घेतले.  आता कारवाईच्या वेळी जबाबदारी झटकून शासनाची, जनतेची  बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. त्याचे  उदाहरण वितरक, कृषी केंद्र संचालकांच्या स्पष्टीकरणातून दिसून येत  आहे. -