शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

हरभरा घोटाळ्यासाठी विक्रेत्यांचे महाबीजकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:21 IST

गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.

ठळक मुद्देमाहितीच न दिल्याने बियाण्याची खुल्या बाजारात विक्री केल्याचा  पवित्रा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो  िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज  जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र  संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६  ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार  घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी  विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार  आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी कडधान्य बियाणे  अनुदानावर देण्यात आले. त्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाणे  पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या  उत्पादकांना राज्याच्या कृषी विभागाने आदेश दिले. त्यानुसार  सर्वाधिक बियाणे पुरवठा करणार्‍या महाबीजने २0 सप्टेंबरपूर्वी वि तरकांना हरभरा बियाणे वाटप केले. या बियाण्यासाठी शासनाकडून  अनुदान मिळणार आहे, अशा सूचना त्यावेळी दिल्याच नसल्याचे वि तरक आणि कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. नेमक्या याच त्रुटीचा  फायदा घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून वितरक, केंद्र  संचालकांकडून सुरू आहे. एकीकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या  बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी वितरक या  गोंधळाची जबाबदारी महाबीजच्या गळ्यात टाकत आहेत, तर  महाबीजनेही त्या सर्वांनाच पाठीशी घालण्याची भूमिका अगदी  सुरुवातीपासूनच घेतल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत  आहे. त्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्‍यांना मिळू  न देता मधल्या दलालांनीच लाटल्याचे हे उत्तम उदाहरण लगतच्या  काळात पुढे आले आहे. विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशावरून जिल्हा अधीक्षक  कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशीत मोठा  घोटाळा उघड झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र  संचालकांनी हरभरा बियाण्याचा केलेला अपहार उघड झाला. त्यापैकी १४६ कृषी केंद्र संचालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास  अधिकारी एच.जी. ममदे यांनी नोटीस बजावल्या. त्यापैकी अनेकांनी  स्वत:च, तर काहींनी एकाच वकिलामार्फत स्पष्टीकरण सादर  केल्याची माहिती आहे. त्यामध्ये २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २0१६ या  काळात महाबीजने वितरकांना त्यांच्याकडून कृषी सेवा केंद्रांना  मिळालेले बियाणे अनुदानित दरावर असल्याची माहितीच नव्हती,  त्यामुळे ते ठरलेल्या दराने विक्री करण्यात आले. ती किंमत खुल्या  बाजारातील भावाप्रमाणे होती. त्यातून शेतकर्‍यांना अनुदानाचा कोण ताही फायदा झालेला नाही. दरम्यान, काहींनी बाजारात वाढलेल्या  प्रचंड दराचा लाभ घेण्यासाठी बियाणे टंचाई भासवून खुल्या बाजारात  विक्रीही केली. काहींनी दलालामार्फत उखळ पाढरे करून घेतले.  आता कारवाईच्या वेळी जबाबदारी झटकून शासनाची, जनतेची  बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. त्याचे  उदाहरण वितरक, कृषी केंद्र संचालकांच्या स्पष्टीकरणातून दिसून येत  आहे. -