शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 10:09 IST

Akola News : प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

- सचिन राऊत

अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ गत दाेन वर्षांत तब्बल दीड काेटीच्या सुमारास दंड ई चालानचा थकीत असून हजाराे वाहनांवर दंड थकीत असल्याने अशा वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून नाेटीस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे.

वाहतूक शाखेचे कामकाज आता अद्ययावत हाेत असून गतीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीड गन कारद्वारे कारवाई करण्यात येते, तर मद्यपींची आराेग्य तपासणी करून दंडात्मक तसेच फाैजदारी कारवाई करण्यात येत आहे़ आतई चालान पध्दतीद्वारे राज्यात कुठेही दंड भरण्याची सुविधा असल्याने तसेच दंडाची रक्कम वाहनावर थकीत राहत असल्याने हजाराे वाहनचालक दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे हजाराे वाहनांवर काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे़ जिल्ह्यात ही रक्कम दीड काेटीच्या घरात दंड थकीत असून वसुलीसाठी पाेलिसांनी आता नाेटीस बजावली आहे.

 

वर्ष कारवाया वसूल दंड

२०१९ ५९५५६ १२२५८९००

२०२० ७४१२८ ७१९४६००

२०२१ ६००००            ५० लाखांच्या सुमारास

 

कसे फाडले जाते ई चालान

एखाद्या वाहनाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक ई चालान पद्धतीत घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते़ यावेळी वाहनचालकाचा परवाना घेऊन ताे मशीनमध्ये तपासल्या जातो. वाहनावर किंवा वाहनचालकाच्या परवान्यावर दंडात्मक रक्कम आपाेआप समाेर येते़ आधी दंड असेल तर नवीन दंड करण्यास अडचणी येतात़ त्यामुळे अशावेळी वाहनचालकाला आधीचा दंड भरणे बंधनकारक आहे़ मात्र, असे असले तरीही काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत असल्याचे वास्तव आहे़

 

माेबाइल अपटेड केला आहे का?

वाहनचालकाचा माेबाइल क्रमांक आता संलग्नित करण्यात येतो. त्यामुळे माेबाइल क्रमांक व आरसी क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे़ तुमच्या माेबाइल क्रमांकावरच दंडाची पावती ऑनलाइन पाठविल्या जाते़ त्यामुळे तुमचे बँक खाते व इतर शासकीय कामासाठी दिलेला माेबाइल क्रमांक वाहन घेतानाही अपडेट करणे गरजेचे आहे़

दंडाची थकबाकी वाढली

ई चालान पद्धतीमध्ये दंड उधारीवर ठेवण्याची मुभा आहे़ त्यामुळे प्रत्येक वाहनचालक पैसे नसल्याचे कारण देऊन त्या ठिकाणावरून निघून जाताे. त्यानंतर पुन्हा ते वाहन पकडेपर्यंत त्याला दंड भरावा लागताे, ही माहिती नसते़ त्यामुळे असा सुमारे दीड काेटी रुपयांचा दंड जिल्ह्यात थकीत असून पाेलिसांनी अशा वाहनचालकांना नाेटीस बजावत दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना केली आहे.

 

थकीत असलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी नाेटीस पाठविण्यात आलेली आहे. तसेच ही वसुली माेहीम आता वेगात सुरू करण्यात येणार आहे़ ज्या वाहनचालकांकडे रक्कम थकीत आहे, त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचीही तरतूद आहे़ त्यामुळे अशा प्रकारे कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे़

- विलास पाटील

वाहतूक शाखा प्रमुख, अकाेला