शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड तर नाही ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई ...

अकाेला : वाहन चालविताना वाहतुकीचे नियम न पाळणारे तसेच वाहनाचे दस्तऐवज साेबत न ठेवणाऱ्या वाहनचालकांवर मे २०१९ पासून ई चालानद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे़ गत दाेन वर्षांत तब्बल दीड काेटीच्या सुमारास दंड ई चालानचा थकीत असून हजाराे वाहनांवर दंड थकीत असल्याने अशा वाहनचालकांना वाहतूक शाखेकडून नाेटीस पाठविण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येकावर आता तुमच्या वाहनावर हजाराेंचा दंड थकीत तर नाही ना, असा सवाल करण्याची वेळ आली आहे. वाहतूक शाखेचे कामकाज आता अद्ययावत हाेत असून गतीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर स्पीड गन कारद्वारे कारवाई करण्यात येते, तर मद्यपींची आराेग्य तपासणी करून दंडात्मक तसेच फाैजदारी कारवाई करण्यात येत आहे़ आतई चालान पध्दतीद्वारे राज्यात कुठेही दंड भरण्याची सुविधा असल्याने तसेच दंडाची रक्कम वाहनावर थकीत राहत असल्याने हजाराे वाहनचालक दंड भरत नसल्याचे वास्तव आहे़ त्यामुळे हजाराे वाहनांवर काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे़ जिल्ह्यात ही रक्कम दीड काेटीच्या घरात दंड थकीत असून वसुलीसाठी पाेलिसांनी आता नाेटीस बजावली आहे.

वर्ष कारवाया वसूल दंड

२०१९ ५९५५६ १२२५८९००

२०२० ७४१२८ ७१९४६००

२०२१ ६०००० ५० लाखांच्या सुमारास

कसे फाडले जाते ई चालान

एखाद्या वाहनाने नियमाचे उल्लंघन केल्यानंतर त्या वाहनाचा क्रमांक ई चालान पद्धतीत घेऊन त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते़ यावेळी वाहनचालकाचा परवाना घेऊन ताे मशीनमध्ये तपासल्या जातो. वाहनावर किंवा वाहनचालकाच्या परवान्यावर दंडात्मक रक्कम आपाेआप समाेर येते़ आधी दंड असेल तर नवीन दंड करण्यास अडचणी येतात़ त्यामुळे अशावेळी वाहनचालकाला आधीचा दंड भरणे बंधनकारक आहे़ मात्र, असे असले तरीही काेट्यवधी रुपयांचा दंड थकीत असल्याचे वास्तव आहे़

माेबाइल अपटेड केला आहे का

वाहनचालकाचा माेबाइल क्रमांक आता संलग्नित करण्यात येतो. त्यामुळे माेबाइल क्रमांक व आरसी क्रमांक अपडेट करणे गरजेचे आहे़ तुमच्या माेबाइल क्रमांकावरच दंडाची पावती ऑनलाइन पाठविल्या जाते़ त्यामुळे तुमचे बँक खाते व इतर शासकीय कामासाठी दिलेला माेबाइल क्रमांक वाहन घेतानाही अपडेट करणे गरजेचे आहे़

दंडाची थकबाकी वाढली

ई चालान पद्धतीमध्ये दंड उधारीवर ठेवण्याची मुभा आहे़ त्यामुळे प्रत्येक वाहनचालक पैसे नसल्याचे कारण देऊन त्या ठिकाणावरून निघून जाताे. त्यानंतर पुन्हा ते वाहन पकडेपर्यंत त्याला दंड भरावा लागताे, ही माहिती नसते़ त्यामुळे असा सुमारे दीड काेटी रुपयांचा दंड जिल्ह्यात थकीत असून पाेलिसांनी अशा वाहनचालकांना नाेटीस बजावत दंडाची रक्कम भरण्याच्या सूचना केली आहे.

थकीत असलेल्या दंडाची रक्कम भरण्यासाठी नाेटीस पाठविण्यात आलेली आहे. तसेच ही वसुली माेहीम आता वेगात सुरू करण्यात येणार आहे़ ज्या वाहनचालकांकडे रक्कम थकीत आहे, त्यांच्यावर फाैजदारी कारवाई करण्याचीही तरतूद आहे़ त्यामुळे अशा प्रकारे कारवाई करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात येणार आहे़

विलास पाटील

वाहतूक शाखा प्रमुख, अकाेला