शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

जलकुंभीवर तोडगाच सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 13:56 IST

अकोला: मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्यापही यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. ही बाब ध्यानात घेता पर्याय म्हणून नदी पात्राची बाराही महिने साफसफाई केल्यास जलकुंभीचा नायनाट होण्यासोबतच परिसरातील साफसफाईवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचा प्रस्ताव भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. हा ...

ठळक मुद्देभाजप नगरसेवकांचा प्रस्ताव धूळ खात

अकोला: मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अद्यापही यश मिळाले नसल्याचे चित्र आहे. ही बाब ध्यानात घेता पर्याय म्हणून नदी पात्राची बाराही महिने साफसफाई केल्यास जलकुंभीचा नायनाट होण्यासोबतच परिसरातील साफसफाईवर लक्ष केंद्रित करता येणार असल्याचा प्रस्ताव भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. हा प्रस्ताव मागील दोन महिन्यांपासून धूळ खात पडून आहे, हे येथे उल्लेखनीय.मोर्णा नदी पात्रातील जलकुंभीमुळे केवळ नदीकाठच्या परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे. शहरातील घाण सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेकडून चक्क मोर्णा नदीचा वापर केला जातो. सांडपाण्यावर प्रक्रिया न करताच घाण पाणी नदी पात्रात सोडल्या जात असल्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. त्यामध्ये घातक रसायनांचा समावेश असल्याने नदीकाठसह इतर भागातील जलस्रोत दूषित झाले आहेत. जलकुंभीमुळे सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांची पैदास वाढली असून, दुर्गंधीमुळे नदीकाठचे रहिवासी त्रस्त झाले आहेत. जलकुंभीवर तोडगा काढण्यासाठी मनपा प्रशासनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा केली होती. पुढे त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. ऐन पावसाळ््याच्या तोंडावर जलकुंभी काढण्यासाठी प्रशासनाकडून निविदा प्रकाशित होत असे. संबंधित कंत्राटदार मजुरांच्या माध्यमातून जलकुंभी काढल्यानंतर नदी काठावर फेकून देत होते. या कामासाठी कंत्राटदाराला आठ ते दहा लाख रुपयांचे देयक अदा केले जात असले तरी चार-पाच महिन्यांच्या कालावधीनंतर नदी पात्रात पुन्हा जलकुंभीची समस्या ‘जैसे थे’ होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळे वर्षभरातून एकदा जलकुंभी न काढता मोर्णा नदी पात्राची बाराही महिने साफसफाई करण्याचा प्रस्ताव दोन महिन्यांपूर्वी भाजपाचे नगरसेवक अजय शर्मा यांनी स्थायी समितीच्या सभेत मांडला होता. या प्रस्तावावर अद्यापपर्यंतही निर्णय न घेतल्यामुळे प्रशासनाच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली आहे.विरोधी पक्ष आहे कुठे?जलकुंभीच्या समस्येमुळे संपूर्ण अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन ठोस निर्णय घेत नसून, सत्ताधाºयांचे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्षाने समोर येणे अपेक्षित असताना महापालिकेत विरोधी पक्षालाच शोधण्याची वेळ आली आहे. मनपात विरोधी पक्षनेता साजिद खान सोयीचे राजकारण करीत असल्याची खमंग चर्चा शहरात होत आहे.