शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अखेर सावरगाव, झरंडी, वसाली येथे आरोग्य पथक दखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST

खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल फिव्हर’ची साथ सुरू ...

खेट्री : जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर तसेच अतिदुर्गम भागात असलेल्या पातूर तालुक्यातील सावरगाव येथे गेल्या आठवडाभरापासून ‘व्हायरल फिव्हर’ची साथ सुरू असून, रुग्णांची संख्या वाढली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णाची तपासणी किंवा कुठल्याही प्रकारचे उपचार केले जात नसल्याने रुग्णांमध्ये वाढ होत आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने १३ ऑगस्ट रोजी बातमी प्रकाशित करताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, सावरगाव येथे आरोग्य पथक दाखल झाले, तसेच दुसऱ्या दिवशी शेजारी असलेल्या झरंडी, वसाली, अशा तिन्ही गावांत घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी व त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

सावरगाव येथे उपकेंद्र असून, त्या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने रुग्ण खासगी डॉक्टरकडे धाव घेत आहेत. त्यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. गेल्या आठवडाभरापासून सावरगाव येथे ‘व्हायरल फिव्हर'ची साथ सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाला असताना, आरोग्य विभागाच्या हलगर्जी व शून्य कारभारामुळे शेकडो रुग्ण आजारी पडले आहेत. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याबाबतचा प्रकार दिसून येत आहे. गावातील आरोग्य विभागाच्या उपकेंद्रात रुग्ण उपचारासाठी जातात, परंतु त्या ठिकाणी रुग्णांना दोन ते तीन गोळ्या दिल्या जातात. यासंदर्भात दि. १३ ऑगस्ट रोजी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन तपासणी सुरू केली आहे.