शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर शेतकऱ्यांना मिळाले तुरीचे चुकारे

By admin | Updated: April 8, 2017 01:48 IST

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी घेतला पुढाकार

सायखेड: अकोला जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यानी खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या तूर विक्रीचे चुकारे न झाल्याचे वृत्त लोकमतने ४ एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शेतकऱ्यांचे चुकारे सुरू केले आहेत. ३१ मार्चनंतर व ४ एप्रिलनंतर जिल्ह्यातील शेतकरी कंपन्यांना महा एफटीओकडून पैसे मिळाले असून, कंपनीकडून ज्या शेतकऱ्यांना तूर विक्री केल्यानंतर पैसे मिळाले नाहीत, त्यांना धनादेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती शेतकरी कंपन्यांकडून मिळाली आहे. यामध्ये बार्शीटाकळीच्या किसान राज कंपनीने खरेदी केलेल्या ३,५०४ क्विंटल तुरीचे चालू आठवड्यात ४७ लाख ७४ हजार ७७५ रुपये मिळाले असून, १९ लाख रुपये बाकी असल्याचे कंपनीचे सचिव प्रकाश माणिकराव यांनी सांगितले. बाळापूर विभागातील बळीराजा कंपनीने खरेदी केलेल्या तुरीचे ३१ मार्चला ३० लाख तर चालू आठवड्यात ३१ लाख रुपये प्राप्त झाल्याची माहिती अंशुमन जाधव यांनी दिली. अकोट अ‍ॅग्रो कंपनीने खरेदी केलेल्या ३२०० क्विंटल तुरीचे चालू आठवड्यात ३२ लाख रुपये मिळाल्याची माहिती एजाज अहमद खान यांनी दिली. पूर्णामय आपातापा शेतकरी उत्पादक कंपनीने ४१२३ क्ंिवटल तूर खरेदी केली, यापोटी चालू आठवड्यात ९ लाख १३ हजार ५५० रुपये प्राप्त झाले, अशी माहिती संतोष शेंडे यांनी दिली. पातूरच्या कंपनीने २,५५४ क्विंटल तूर खरेदी केली, त्यांना अद्यापही रक्कम मिळाली नसल्याचे दादाराव देशमुख यांनी सांगितले.कौलखेड जहागीरच्या आधुनिक किसान शेतकरी उत्पादक कंपनीने २१२५ क्ंिवटल तूर खरेदी केली होती, ही तूर ८९ शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात आली. ं४ एप्रिल रोजी ४४ लाख प्राप्त झाले असून, ६० टक्के शेतकऱ्यांचे पैसे बाकी असल्याची माहिती मनोज तायडे यांनी दिली. तेल्हाऱ्याच्या शिवार्पण शेतकरी उत्पादक कंपनीलासुद्धा नुकतेच पैसे मिळाल्याची माहिती शिवाजी बहाकर यांनी दिली.शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तुरीची खरेदी करावीअकोला जिल्ह्यात कृषी उत्पादन बाजार समित्यांच्या यार्डमध्ये सुरू केलेल्या नाफेड केंद्रांवर तूर खरेदीवेळी शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तब्बल एक ते दोन महिन्यांपासून अनेक केंद्रांवर शेतकरी तुरीच्या मापाच्या प्रतीक्षेत आहेत.  सध्या बारदान्याअभावीसुद्धा तूर खरेदीसाठी विलंब होत आहे. जिल्ह्यातील उत्पादक कंपन्यानी शेतकऱ्यांची तूर खरेदी करताना कोणत्याही रांगा न लावता सरळ पद्धतीने खरेदी केली. त्यामुळे नाफेड केंद्रावर होणारी गैरसोय टाळण्यासाठी शेतकरी उत्पादके कंपन्यांनी पुन्हा तुरीची खरेदी सुरू करावी, अशी मागणी ग्रामीण शेतकरी वर्गाकडून होत आहे.आम्ही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी तूर खरेदीनंतर तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना चुकाऱ्याचे पैसे मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत २५ मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन कळविले होते. सध्या प्राप्त झालेल्या रकमेतून शेतकऱ्यांना धनादेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे.- अंशुमन जाधव, बळीराजा शेतकरी उत्पादक कंपनी बाळापूर विभाग.