शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
4
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
5
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
6
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
7
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
8
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
9
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
10
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
11
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
12
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
13
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
14
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
15
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
17
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
19
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
20
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  

अकाेल्यात रेमडेसिविरचा अनुशेष भरून काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:13 IST

अकोला: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणारी रेमडेसिविरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा ...

अकोला: राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांसाठी उपचारासाठी प्रभावी समजल्या जाणारी रेमडेसिविरची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा तुटवडा भासत असून याचा काळाबाजार सुरू आहे. या प्रकाराकडे येथील विधिज्ञ उमेश पैठणकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल करून लक्ष वेधले असता अकाेल्यात रेमडेसिविरचा अनुशेष भरून काढण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. रेमडेसिविर इंजेक्शनच्या अभावी कोरोना बाधितांचा मृत्यू होत असल्याची ओरड होत आहे. राज्य सरकारद्वारे या इंजेक्शनचे वाटप करताना दुजाभाव केल्या जात असल्याचा आरोप होत आहे. अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना त्या तुलनेत इंजेक्शनचा पुरवठा कमी होत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपासून ही संख्या झपाट्याने वाढली आहे. अकोला जिल्ह्याला मुबलक रेमडेसिविरचा पुरवठा होत नसल्याची एक जनहित याचिका उमेश पैठणकर यांनी नागपूर उच्च न्यायालयात दाखल केली होती.

सध्याची परिस्थिती पाहून १ मे च्या संध्याकाळपर्यंत राज्य सरकारने अकोला , नागपूर, भंडारा या तिन्ही जिल्ह्याचा रेमडेसिविरचा अनुशेष भरून काढावा, असे या आदेशात म्हटले असल्याचे पैठणकर यांनी सांगितले.

अशी आहे गरज

अकोल्यात सुमारे ९०० इंजेक्शनची आवश्यकता आहे त्या तुलनेत केवळ ५०० इंजेक्शनचा पुरवठा केला जात होता. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता रविवारी सायंकाळपर्यंत नागपूरला १५०००, अकोला जिल्ह्याला ३००० ,भंडारा जिल्ह्याला २००० रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा मिळणार आहे. मिळालेल्या साठ्याचे नियोजन करून पुरवठा करण्याची जवाबदारी न्यायालयाने जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवली आहे. तर पुढील काळात राज्य सरकारने नोडल अधिकारी नियुक्त करून राज्यातील जिल्ह्यांची रुग्णांची संख्या पाहून वाटप करण्याचेही आदेश दिले आहेत, अशी माहिती विधिज्ञ चेतन लोहिया यांनी दिली आहे.