शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

अन्यायाच्या विरोधात लढा देणे म्हणजे ‘जिहाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:50 IST

अकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय  आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक  आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा  देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य  असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे  कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने  इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत  नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनवरात्र व्याख्यानमाला

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अलीकडच्या काळात ‘जिहाद’ हा चर्चेचा विषय  आहे. इस्लाम समजून घेताना जिहाद समजून घेणे आवश्यक  आहे. जिहाद म्हणजे अन्यायाच्या विरोधात सर्वशक्तीनिशी लढा  देणे; मात्र कुराणात सांगितल्याप्रमाणे किंवा इस्लामला मान्य  असलेले जिहादी वर्तन अलीकडच्या काळात होत नाही. याचे  कारण म्हणजे मुळातच इस्लाम समजून घेतलेला नाही. ज्याने  इस्लाम समजून घेतला, तो कधीच समाजविरोधी वर्तन करीत  नाही, असे मत प्रा.शम्सुद्दीन तांबोळी (पुणे) यांनी व्यक्त केले.प्रमिलाताई ओक सभागृह येथे बुधवारपासून नवरात्र व्या ख्यानमालेला प्रारंभ झाला. बाबूजी देशमुख वाचनालयाच्याव तीने आयोजित नवरात्र व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्रा.तांबोळी  यांनी गुंफले. ‘मुस्लीम समाज-प्रतिमा, वास्तव, सुधारणा’ या  विषयावर प्रा.तांबोळी यांनी विचार व्यक्त केले. आधुनिक दृष्टी  आणि सत्यशोधक वृत्ती असलेल्या हमीद दलवाई यांच्या  ‘मुस्लीम सत्यशोधक समाजाचा’ वैचारिक वारसा प्रा.तांबोळी  चालवित आहेत. प्रा.तांबोळी पुढे म्हणाले, की जिहाद हा दोन प्रकारचा असतो.  एक अल-ए-अकबर आणि दुसरा अल-ए-असगर. अल-ए- अकबर हा श्रेष्ठ दर्जाचा असतो. आणि अल-ए-असगर हा  दुय्यम दर्जाचा. अल-ए-अकबर प्रकार अहिंसा करणे शिकवि तो. शांततेत स्वत:च्या विरोधात लढा यामध्ये दिला जातो. प्रत्येक  माणसात षडरिपू असतात. ते बाजूला सारू न आत्मशुद्धी करणे  म्हणजे अल-ए-अकबर जिहाद. सच्चा मुसलमान, सज्जन  मुस्लमान तयार होणे किंवा करणे यामध्ये अपेक्षित असते.  अल-ए-असगर यामध्ये रक्तपात, हिंसा करण्याची परवानगी  दिलेली आहे. तुमच्या आणि अल्लाच्या मधात जर कोणी येत  असेल, तर स्वरक्षणासाठी आणि अन्याय होत असेल, तर  अन्याच्या विरोधात शस्त्र उगारण्याची परवानगी यामध्ये दिली  आहे; परंतु आजच्या काही जिहादी संघटनांनी याचा पूर्णपणे अ र्थ समजून न घेतल्याने आत्मघातकी, हिंसक घटना घडवितात,  ज्या इस्लाममध्ये सांगितलेल्या आचरणाविरोधात आहे.फतवा याविषयी प्रा.तांबोळी यांनी सांगितले, की फतवा हा  धार्मिक आदेश नसून, तो ज्येष्ठांनी दिलेला सल्ला असतो; मात्र  आजकाल फतव्याला आदेश मानून याविरोधी अनेक आंदोलने  होतात.  इस्लामच्या आचरणात इमामला (जाणकार) एखाद्या  समस्येवर, घटनेवर मत विचारणे. यावर जाणकाराने दिलेला  सल्ला हा फतवा नसतो. परिस्थिती, काळानुरू प हा फतवा मान्य  किंवा अमान्य करण्याचा अधिकारी इस्लाम धर्माने प्रत्येक  नागरिकाला दिला आहे. एखाद्या व्यक्तीने समस्यांचे, प्रश्नांचे  उत्तर शोधताना सदसद्विवेकबुद्धीने निर्णय घेऊन वागणे, हेच  मो. पैगंबरांना अपेक्षित असते.