शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

जमिनीची सुपीकता घटतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:21 IST

अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत.

- राजरत्न सिरसाट

अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात केंद्र सरकार पुरस्कृत संशोधन प्रकल्पामध्ये भौगालिक स्थळ व माहिती प्रणाली आधारित अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करू न हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्था यांनी या प्रकल्पाला निधी उपलब्ध करू न दिला आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ४,४६४ माती नमुन्यांच्या आधारे विदर्भातील जमिनीची सुपीकता तपासण्यात आली. या निष्कर्षावरू न विदर्भातील जमिनींमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४०, गंधक २०.४५ व जस्त ५०.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्याचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण याआधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. ही धोक्याची घंटा आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार विविध संसाधनाचा वापर करू न जमिनीचे आरोग्य सुधारणे हाच एक उपाय आहे. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्वत उत्पादकतेसाठी गरजेचा आहे. वाढत्या सूक्ष्म व दुय्यम अन्नदव्याचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीतील पोषक जीवाणूंचे प्रमाण घटले आहे. त्याचा परिणाम मानवी जीवन व जनावरांवर झाला आहे. २४ ते ४५ वयोगटातील महिलांमध्ये लोह, गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू न शेतपोत सुधारण्याची महत्त्वाची जबाबदारी संशोधकांवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर माती परीक्षण व शेत मातीचे आरोग्यपत्रिका बनविण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि, या माती परीक्षणाचा फायदा किती झाला, हा संशोधनाचा भाग आहे. राज्यातील कृषी विद्यापीठासह कृषी विभागाने माती परीक्षणावर भर दिला. मातीतील अन्नद्रव्य घटल्याने त्याचा परिणाम पिकांवर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मातीचा सामू बघून शेतकºयांना कोणत्या जमिनीत कोणती पिके घ्यावीत, हे ठरविणे गरजेचे आहे. तथापि, याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने त्याचे परिणाम उत्पादनावर होत आहेत. आता याकडे गांर्भीयाने बघण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती