शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

जमिनीची सुपीकता घटतेय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 12:21 IST

अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत.

- राजरत्न सिरसाट

अकोला: विदर्भातील जमिनीची सुपीकता दर्शक नकाशे तयार करण्यात आले असून, या जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण आणखी घसरत चालल्याचे चिंताजनक निष्कर्ष यामधून समोर आले आहेत. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार जमिनीचे आरोग्य सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृ षी विद्यापीठाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागात केंद्र सरकार पुरस्कृत संशोधन प्रकल्पामध्ये भौगालिक स्थळ व माहिती प्रणाली आधारित अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करू न हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या कृषी व सहकार विभाग आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या भोपाळ येथील भारतीय मृद विज्ञान संस्था यांनी या प्रकल्पाला निधी उपलब्ध करू न दिला आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. ४,४६४ माती नमुन्यांच्या आधारे विदर्भातील जमिनीची सुपीकता तपासण्यात आली. या निष्कर्षावरू न विदर्भातील जमिनींमध्ये ९७.३६ टक्के नत्राची कमतरता आढळून आली आहे. स्फुरद ४९.४०, गंधक २०.४५ व जस्त ५०.७७ टक्के आढळून आले आहे. त्याचप्रमाणे लोह, पालाश, बोरॉन या अन्नद्रव्याचे प्रमाण घटल्याचे आढळले आहे. हे प्रमाण याआधीच्या अभ्यासातील प्रमाणापेक्षा कमी झाले आहे. ही धोक्याची घंटा आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पद्धतीनुसार विविध संसाधनाचा वापर करू न जमिनीचे आरोग्य सुधारणे हाच एक उपाय आहे. अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार खतांचा योग्य वापर करावा लागणार आहे. भौगालिक स्थळ प्रणालीवर आधारित माहितीचा वापर पिकांच्या शाश्वत उत्पादकतेसाठी गरजेचा आहे. वाढत्या सूक्ष्म व दुय्यम अन्नदव्याचा भरमसाट वापर वाढल्याने जमिनीतील पोषक जीवाणूंचे प्रमाण घटले आहे. त्याचा परिणाम मानवी जीवन व जनावरांवर झाला आहे. २४ ते ४५ वयोगटातील महिलांमध्ये लोह, गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करू न शेतपोत सुधारण्याची महत्त्वाची जबाबदारी संशोधकांवर असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर माती परीक्षण व शेत मातीचे आरोग्यपत्रिका बनविण्यावर भर देण्यात येत आहे. तथापि, या माती परीक्षणाचा फायदा किती झाला, हा संशोधनाचा भाग आहे. राज्यातील कृषी विद्यापीठासह कृषी विभागाने माती परीक्षणावर भर दिला. मातीतील अन्नद्रव्य घटल्याने त्याचा परिणाम पिकांवर होऊ नये म्हणून ही दक्षता घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मातीचा सामू बघून शेतकºयांना कोणत्या जमिनीत कोणती पिके घ्यावीत, हे ठरविणे गरजेचे आहे. तथापि, याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याने त्याचे परिणाम उत्पादनावर होत आहेत. आता याकडे गांर्भीयाने बघण्याची गरज आहे.

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती