शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

ढगाळ वातावरणाने धास्ती; पारा घसरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:19 IST

मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तिळासह फळपिकांचे नुकसान ...

मार्च महिन्यात गहू काढणीवर असताना सलग चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यात गहू, कांदा, तिळासह फळपिकांचे नुकसान झाले होते. मागील दहा दिवस उन्हाचा पारा चढला होता. त्यामुळे यापुढे तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, जिल्ह्यात गुरुवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांची गहू, हरभरा विकण्याची लगबग सुरू आहे. अशात या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जमिनीपासून साधारण ३ किमी अंतरावर सक्रिय असलेले चक्राकार वारे, तापमानात होणारी घट आणि निरंतर वाढणारी आर्द्रता तसेच तेलंर्णाना, कर्नाटक सीमा क्षेत्रात सक्रिय असलेले सिस्टिमचे विस्तारित टोक विदर्भाच्या पश्चिम-दक्षिण सीमेपर्यंत पोहोचले आहे. गुरुवारच्या उपग्रह छायाचित्रानुसार मराठवाडा विभागातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, हिंगोली, विदर्भातील वाशिम, यवतमाळ, बुलडाणा, अमरावती (धारणी, चिखलदरा तालुका), अकोला, चंद्रपूर तर नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यांच्या सीमा परिसरात तसेच सोलापूर-सांगली, उत्तर सातारा इत्यादी जिल्ह्यांमध्ये वातावरण ढगाळलेले होते.

--कोट--

अकोला जिल्ह्याच्या शेजारील बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत गडगडाटसह वादळी पावसाची शक्यता दिसून येत आहे. निरंतर ढगाळ वातावरण आणि आर्द्रता रात्रीच्या वातावरणात ‘उमस’ तसेच किंचित तापमान वाढ होण्याची शक्यता आहे.

-संजय अप्तूरकर, हवामान अभ्यासक

--बॉक्स--

तापमानात घट; पारा ४२ अंशावर

जिल्ह्यात गुरुवारी ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट पाहावयास मिळाली. बुधवारी जिल्ह्याचा पारा ४२.९ अंश सेल्सिअस होता. दोन दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता असताना गुरुवारी पारा घसरून ४२.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.