शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

पूर ओसरल्यानंतरही धास्ती अन् वेदना कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

मनपा प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरविल्याने घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्यांमधून पुराच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. स्थानिक राजकारण्यांच्या संमतीने ...

मनपा प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरविल्याने घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्यांमधून पुराच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. स्थानिक राजकारण्यांच्या संमतीने काही बांधकाम व्यावसायिकांनी निकष, नियम धाब्यावर बसवित सखल भागात ले-आउटचे निर्माण करून, नियमबाह्यरीत्या रहिवासी इमारती व डुप्लेक्सचे निर्माण केले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केलेच नाही. परिणामी, प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील अकाेली बु., परिसर एमराॅल्ड काॅलनी, माताेश्री काॅलनी भागात पाचव्या दिवशीही पुराचे पाणी कायम आहे. प्रभाग १७ मधील माेर्णा नदीकाठच्या रमाबाई आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठेनगर, तसेच प्रभाग ९ अंतर्गत भगिरथ वाडी, आरपीटीएस भागात गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

फोटो:

नाला तयार करण्याच्या कामाला गती

प्रभाग १८ मधील अकाेली बु., हिंगणा भागातून माेर्णा नदीचे पाणी माताेश्री काॅलनी, एमराॅल्ड काॅलनीत शिरले. तेथून गंगा नगर व पुढे प्रभाग ८ मध्ये शिरले. उच्चभ्रू नागरिकांच्या काॅलनीतील पाण्याचा निचरा हाेण्यासाठी मूळ मालमत्ताधारकांनी नाल्यांची व्यवस्थाच उभारली नाही. समस्येवर ताेडगा म्हणून प्रभागाच्या नगरसेविका जयश्री दुबे यांनी माेठा नाला तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून आले.

घरासमाेर साचलेले पाणी कायम असल्याने, एकमेकांच्या टेरेसवरून बाहेर जावे लागत आहे. घरातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या. त्या काळाेख्या रात्री इमारतीमधील रहिवाशांनी आश्रय दिला.

- सुनंदा अशाेक शिरसाट रहिवासी,एमराॅल्ड काॅलनी

रात्री अचानक घरात पाणी शिरले. नंतर पाच ते सहा फुटांपर्यंत पातळी वाढल्याने कुटुंबीयांना घेऊन घराच्या टेरेसवर चढलाे. अखेर नजीकच्या इमारतीमध्ये रात्र काढली. अजूनही पाण्याचा निचरा झाला नाही.

- दीपेश ठाकूर रहिवासी एमराॅल्ड काॅलनी

दाेन वर्षांपूर्वी डुप्लेक्स खरेदी करून वास्तव्याला आलाे. ‘त्या’ रात्री पुराच्या पाण्यासाेबतच साप घरात शिरले. साहित्य खराब झाले. जीव मुठीत घेऊन रात्र काढली. पाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची व्यवस्थाच केली नाही.

-शालीग्राम बाेंडे रहिवासी माताेश्री काॅलनी

ले-आउटधारकाने नाल्यांची व्यवस्था न केल्याचा परिणाम भाेगावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली असून, माेठे साप आढळून येत आहेत. रस्ते, पथदिवे व पाण्यासाठी जलवाहिनीची सुविधा नाही. आराेग्याला धाेका झाला आहे.

- ज्याेती वाकडे, रहिवासी माताेश्री काॅलनी

नाल्यामध्ये जलकुंभी असल्याने पुराच्या पाण्याचा निचरा न हाेता ते थेट घरात शिरले. त्याच्या प्रवाहामुळे घराची भिंत काेसळून घरातील साहित्य वाहून गेले. शासनाने त्वरित मदत द्यावी.

- तुळसाबाई अरुण वानखडे रहिवासी, रमाबाई आंबेडकरनगर

माेर्णा नदीतील राजेश्वर सेतू पुलाजवळ कचऱ्यामुळे पाण्याला आडकाठी झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह घराकडे वळला. त्यात संपूर्ण घर भुईसपाट झाले. घरातील सर्व साहित्य वाहून गेले. लहान मुलांना साेबत घेउन जीव वाचविला.

- दुर्गा केशव गायकवाड रहिवासी, अण्णाभाऊ साठेनगर