शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

पूर ओसरल्यानंतरही धास्ती अन् वेदना कायम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:20 IST

मनपा प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरविल्याने घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्यांमधून पुराच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. स्थानिक राजकारण्यांच्या संमतीने ...

मनपा प्रशासनाने नाले सफाईकडे पाठ फिरविल्याने घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्यांमधून पुराच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. स्थानिक राजकारण्यांच्या संमतीने काही बांधकाम व्यावसायिकांनी निकष, नियम धाब्यावर बसवित सखल भागात ले-आउटचे निर्माण करून, नियमबाह्यरीत्या रहिवासी इमारती व डुप्लेक्सचे निर्माण केले. सांडपाणी वाहून जाण्यासाठी नाल्यांचे बांधकाम केलेच नाही. परिणामी, प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाऱ्या हद्दवाढ क्षेत्रातील अकाेली बु., परिसर एमराॅल्ड काॅलनी, माताेश्री काॅलनी भागात पाचव्या दिवशीही पुराचे पाणी कायम आहे. प्रभाग १७ मधील माेर्णा नदीकाठच्या रमाबाई आंबेडकरनगर, अण्णाभाऊ साठेनगर, तसेच प्रभाग ९ अंतर्गत भगिरथ वाडी, आरपीटीएस भागात गरिबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

फोटो:

नाला तयार करण्याच्या कामाला गती

प्रभाग १८ मधील अकाेली बु., हिंगणा भागातून माेर्णा नदीचे पाणी माताेश्री काॅलनी, एमराॅल्ड काॅलनीत शिरले. तेथून गंगा नगर व पुढे प्रभाग ८ मध्ये शिरले. उच्चभ्रू नागरिकांच्या काॅलनीतील पाण्याचा निचरा हाेण्यासाठी मूळ मालमत्ताधारकांनी नाल्यांची व्यवस्थाच उभारली नाही. समस्येवर ताेडगा म्हणून प्रभागाच्या नगरसेविका जयश्री दुबे यांनी माेठा नाला तयार करण्याचे काम हाती घेतल्याचे दिसून आले.

घरासमाेर साचलेले पाणी कायम असल्याने, एकमेकांच्या टेरेसवरून बाहेर जावे लागत आहे. घरातील सर्व वस्तू पाण्यात भिजल्या. त्या काळाेख्या रात्री इमारतीमधील रहिवाशांनी आश्रय दिला.

- सुनंदा अशाेक शिरसाट रहिवासी,एमराॅल्ड काॅलनी

रात्री अचानक घरात पाणी शिरले. नंतर पाच ते सहा फुटांपर्यंत पातळी वाढल्याने कुटुंबीयांना घेऊन घराच्या टेरेसवर चढलाे. अखेर नजीकच्या इमारतीमध्ये रात्र काढली. अजूनही पाण्याचा निचरा झाला नाही.

- दीपेश ठाकूर रहिवासी एमराॅल्ड काॅलनी

दाेन वर्षांपूर्वी डुप्लेक्स खरेदी करून वास्तव्याला आलाे. ‘त्या’ रात्री पुराच्या पाण्यासाेबतच साप घरात शिरले. साहित्य खराब झाले. जीव मुठीत घेऊन रात्र काढली. पाण्याचा निचरा हाेण्यासाठी नाल्यांची व्यवस्थाच केली नाही.

-शालीग्राम बाेंडे रहिवासी माताेश्री काॅलनी

ले-आउटधारकाने नाल्यांची व्यवस्था न केल्याचा परिणाम भाेगावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुर्गंधी पसरली असून, माेठे साप आढळून येत आहेत. रस्ते, पथदिवे व पाण्यासाठी जलवाहिनीची सुविधा नाही. आराेग्याला धाेका झाला आहे.

- ज्याेती वाकडे, रहिवासी माताेश्री काॅलनी

नाल्यामध्ये जलकुंभी असल्याने पुराच्या पाण्याचा निचरा न हाेता ते थेट घरात शिरले. त्याच्या प्रवाहामुळे घराची भिंत काेसळून घरातील साहित्य वाहून गेले. शासनाने त्वरित मदत द्यावी.

- तुळसाबाई अरुण वानखडे रहिवासी, रमाबाई आंबेडकरनगर

माेर्णा नदीतील राजेश्वर सेतू पुलाजवळ कचऱ्यामुळे पाण्याला आडकाठी झाली. त्यामुळे पाण्याचा प्रवाह घराकडे वळला. त्यात संपूर्ण घर भुईसपाट झाले. घरातील सर्व साहित्य वाहून गेले. लहान मुलांना साेबत घेउन जीव वाचविला.

- दुर्गा केशव गायकवाड रहिवासी, अण्णाभाऊ साठेनगर