शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
5
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
6
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
7
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
8
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
9
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
10
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
11
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
13
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
14
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
15
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
16
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
17
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
18
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
19
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
20
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा

बाप-लेकास सात वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:10 IST

अकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका  इसमावर हल्ला करणार्‍या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने  सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने  सुनावली आहे.

ठळक मुद्देलोहारा येथील घटना११ साक्षीदार तपासले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील एका  इसमावर हल्ला करणार्‍या बाप-लेकास जिल्हा व सत्र न्यायालयाने  सात वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा गुरुवारी सुनावली. यासोब तच प्रत्येकी ५00 रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने  सुनावली आहे.लोहारा येथील रहिवासी महादेव हिंमतराव तायडे त्यांचे वडील  हिंमतराव तायडे व भाऊ संतोष तायडे यांच्यावर क्षुल्लक  कारणावरून काशीनाथ यशवंत जंजाळ आणि राजेश काशीनाथ  जंजाळ या दोघांनी २९ सप्टेंबर २0१५ रोजी सकाळी कुर्‍हाड व  लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला चढविला होता. यामध्ये गंभीर ज खमी झालेल्या तायडे पिता-पुत्रास तातडीने रुग्णालयात दाखल  करण्यात आले होते. त्यानंतर जखमी महादेव तायडे यांच्या  तक्रारीवरून उरळ पोलिसांनी काशीनाथ यशवंत जंजाळ आणि  राजेश काशीनाथ जंजाळ या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या  कलम ३0७, ३२४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर  प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.  जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयाने या  प्रकरणात ११ साक्षीदार तपासल्यानंतर दोन्ही आरोपीविरुद्ध समोर  आलेल्या ठोस पुराव्यावरून कलम ३0७ अन्वये सात वर्षांचा  सश्रम कारावास व प्रत्येकी ५00 रुपये दंड आणि दंड न भरल्यास  आणखी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. कलम ३२४ अन्वये  दोघांनाही दोन वर्षांची शिक्षा आणि प्रत्येकी ५00 रुपये दंड  ठोठावला. दंड न भरल्यास आणखी सहा महिन्यांची शिक्षा  न्यायालयाने जंजाळ पिता-पुत्रास सुनावली.

बाप-लेकाचे वेडसर असल्याचे नाटकया प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपी राजेश काशीनाथ जंजाळ  हा वेडसर असल्याचे सांगण्यात आले; मात्र त्याची नागपूर येथील  रुग्णालयात तपासणी केली असता तो वेडसर नसल्याचे समोर  आले. त्यानंतर त्याचे वडील काशीनाथ यशवंत जंजाळनेसुद्धा  वेडसर होण्याचे नाटक केले; मात्र त्याचीही तपासणी केल्यानंतर हे  दोघेही वेडसर नसल्याचे प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले. त्यामुळे या  प्रकरणातून वाचण्यासाठी बाप-लेकाने हा आटापिटा केल्याचे  समोर आले.

दुचाकीवर पडल्याने जखमी झाल्याचा आरोपया प्रकरणातील जखमी तायडे कुटुंबीय हे दुचाकीवरून पडल्याने  जखमी झाल्याचा आरोप जंजाळ पिता-पुत्राने केला; मात्र ११  साक्षीदार तपासल्यानंतर न्यायालयाने जंजाळ खोटे बोलत  असल्याचे सांगत त्यांना सात वर्षांची शिक्षा सुनावली.