शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

दररोज ३० ते ३५ जणांच्या नशिबी शिवभोजन थाळीही राहत नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST

अकोला : गरिबांना पोटभर जेवण मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली; मात्र शहरातील केंद्रांवर मंजूर थाळींची ...

अकोला : गरिबांना पोटभर जेवण मिळावे, यासाठी शासनाने शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली; मात्र शहरातील केंद्रांवर मंजूर थाळींची संंख्या कमी असल्याने दररोज ३० ते ३५ जणांना जेवणाअभावी परत जावे लागत आहे. दिवसभर काम करताना त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे विदारक चित्र आहे.

जिल्ह्यात एकूण १९ शिवभोजन केंद्रे आहेत. त्यात ४१०० थाळ्या लाभार्थींना दिल्या जात आहेत. ग्रामीण भागातून शहरात दररोज येणारे नागरिक आणि शहरातील लाभार्थींची संख्या पाहता शहरात विविध भागात ५ केंद्रे कार्यरत आहेत. त्यातून केवळ १५०० लाभार्थींना भोजन दिले जाते; मात्र सध्या लाभार्थींची वाढलेली संख्या पाहता काहींना उपाशीपोटीच रहावे लागत आहे. त्यांच्या नशिबात शिवभोजन थाळीही नसल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र - १९

रोजच्या थाळी लाभार्थींची संख्या - ४१००

शहरातील एकूण शिवभोजन केंद्र - ५

शहरातील रोज थाळींची संख्या - १५००

३० जण उपाशीपोटी परतले!

सर्वोपचार रुग्णालयातील केंद्र : येथील सर्वोपचार रुग्णालयात अकोल्यासह बुलडाणा, वाशिम जिल्ह्यातील रुग्ण उपचारासाठी येतात. शेकडो रुग्णांना येथील शिवभोजन केंद्राचा आधार आहे; परंतु थाळींची संख्या कमी असल्याने जवळपास ५० जण उपाशीपोटी परतत आहेत.

बाजार समितीत केंद्र : शहरातील बाजार समितीत दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने शेतकरी येतात. गोरगरीब शेतकरी व बाजारात काम करणाऱ्या कष्टकऱ्यांची येथील शिवभोजन केंद्रावर गर्दी असते. या केंद्रात देखील लवकरच थाळींचा कोटा संपतो. त्यामुळे अनेकांना उपाशी परत जावे लागते किंवा अन्य ठिकाणी गरिबांच्या खिशाला न परवडणारे जेवण घ्यावे लागते.

दररोज चार हजार जणांचे पोट भरते; बाकीच्यांचे काय?

जिल्ह्यात दररोज ४१०० थाळींचे वितरण केले जाते; मात्र अनेकांना उपाशीपोटी परतावे लागते.

ही परिस्थिती पाहता बहुतेक केंद्रांवर थाळींचा कोटा वाढवून देण्याची मागणी केली जात आहे.