शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

आता प्रवेशासाठी जीवघेणी स्पर्धा!

By admin | Updated: June 8, 2016 02:28 IST

अकोला जिल्ह्यात विज्ञान शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या २२ हजारावर, जागा मात्र १0 हजारांपेक्षाही कमी!

नितीन गव्हाळे / अकोलाजिल्ह्यातील उत्तीर्णतेचे विद्यार्थ्यांची संख्या पाहता यावर्षीही विज्ञान शाखेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच चढाओढ राहणार आहे. जिल्ह्यातून विशेष श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ५८९९ इतकी आहे, तर प्रथम श्रेणीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या ८५३७ इतकी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेसाठी १0 हजार पेक्षाही कमी प्रवेश क्षमता असल्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीचा विचार करता बहुतांश विद्यार्थी हे विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असतात. गेल्या काही वर्षांपासून विज्ञानसाठी असलेली चुरस यंदाही कायम राहणार असल्याचे चित्र आहे. शहरात विज्ञान शाखेच्या शहर आणि ग्रामीण भागात विज्ञानाकडे प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांचा कल असतो. त्यातही नामांकित महाविद्यालये आपल्याच संस्थेतील विद्यार्थ्यांना आणि प्रावीण्य श्रेणी, प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देत असल्यामुळे प्रवेश मिळविण्यासाठी बाहेरील विद्यार्थ्यांंना प्रवेशासाठी चांगलेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. दहावीच्या निकालात विद्यार्थी नव्वदी गाठत असल्यामुळे विज्ञान शाखेवरील ताण वाढला आहे. उपलब्ध प्रवेश क्षमतेमध्ये सर्वाधिक प्रवेश हे विज्ञान शाखेचेच होत असल्यामुळे निर्धारित मुदतीनंतरही विज्ञान शाखेसाठी विनाअनुदानित तुकडी वाढवून देण्यासाठी महाविद्यालयांकडून आग्रह धरला जातो.