शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपाचा ‘फार्स’च!

By admin | Updated: July 26, 2016 02:07 IST

पेरणी आटोपली: शेतक-यांची मागणीच नाही!

संतोष येलकर/अकोलापीक कर्ज मिळण्यास अपात्र असलेल्या राज्यातील कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला असला तरी, खरीप पेरणी आटोपल्याने, अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात मोफत कपाशीच्या बियाण्यांस शेतकर्‍यांकडून मागणी नाही, त्यामुळे शेतकर्‍यांना मोफत कपाशी बियाणे वाटपाचा सरकारचा निर्णय ह्यफार्सह्णच ठरला आहे.सन २0१२-१३ व २0१३-१४ मध्ये पीक कर्ज घेतलेल्या आणि कर्जाची परतफेड केली नसल्याने, सन २0१६ यावर्षीच्या खरीप हंगामात पीक कर्ज मिळण्यासाठी थकबाकीदार राज्यातील ६ लाख ७१ हजार शेतकरी अपात्र आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक २१ जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांपैकी कपाशीची पेरणी करू न शकलेल्या शेतकर्‍यांना कमाल एक एकराच्या क्षेत्र र्मयादेत कापूस बियाण्याची प्रत्येकी दोन पाकिटे मोफत वाटप करण्यास मंजुरी देण्यात येत असल्याचा निर्णय शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन विभागामार्फत गत ५ जुलै रोजी घेण्यात आला. शासनाचा हा निर्णय ७ जुलै रोजी जिल्हाधिकारी,कृषी विभागाच्या कार्यालयांना प्राप्त झाला; परंतु यावर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्यानंतर मोफत बियाण्याचा निर्णय प्राप्त झाल्याने, मोफत कपाशी बियाण्यासाठी शेतकर्‍यांकडून मागणी नाही. या पृष्ठभूमीवर अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करण्याचा सरकारचा हा निर्णय केवळ ह्यफार्सह्णच ठरल्याचे चित्र आहे. अमरावती विभागात बियाणे वाटपास सुरुवातही नाही!शासनाच्या निर्णयानुसार कापूस उत्पादक राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर व चंद्रपूर इत्यादी २१ कापूस उत्पादक जिल्हय़ातील थकबाकीदार शेतकर्‍यांना मोफत कपाशीचे बियाणे वाटप करावयाचे आहे; परंतु खरीप पेरण्या आटोपल्याने, मोफत कपाशी बियाण्यास शेतकर्‍यांकडून मागणी नाही. त्यामुळे अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्ह्यात सरकारी मोफत कपाशी बियाणे वाटपास अद्याप सुरुवातही झाली नाही. मोफत बियाणे वाटपासंबंधीचा अहवाल अद्याप अमरावती विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडे प्राप्त झाला नाही. त्यामुळे विभागात मोफत कपाशी बियाणे वाटप सुरू करण्यात आले नसल्याचे स्पष्ट होत आहे.