शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

कैद्यांनी पिकविलेल्या शेतीतून ५०० जणांना मिळते दाेन वेळचे जेवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:21 IST

काेराेनाच्या भीषण संकटात मध्यवर्ती कारागृहात असलेली कैद्यांची भरमसाट संख्या कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच हालचाली झाल्या हाेत्या. त्यामुळे अकाेला जिल्हा ...

काेराेनाच्या भीषण संकटात मध्यवर्ती कारागृहात असलेली कैद्यांची भरमसाट संख्या कमी करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच हालचाली झाल्या हाेत्या. त्यामुळे अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ४० पेक्षा अधिक कैद्यांना पॅराेलवर जामीन देण्यात आला हाेता. त्यामुळे काही प्रमाणात संख्या कमी झाली़, तर रेल्वे स्टेशन परिसरात उभारलेल्या तात्पुरत्या कारागृहातही कैद्यांना ठेवण्यात आल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या ४५७ कैद्यांचे सामाजिक अंतर पाळण्यास मदत झाली़. याच काळाच्यापूर्वी मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मशिनरीज अमरावती येथे पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या शेती कसणे व शासनाने ठरवून दिलेली इतर कामे करण्यात येत आहेत. काेराेना काळात मास्कही बनवल्याची माहिती आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययाेजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच काेराेनाचा धाेका हाेऊ नये म्हणून बाहेरील व्यक्तींना आतमध्ये प्रवेश देण्यात येत नसल्याची माहिती आहे.

जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एकूण कैदी - ४५७

पॅराेलवर बाहेर असलेले कैदी - ४१

गंभीर गुन्ह्यातील कैदी - १४७

काय बनविले जाते...

लाकडापासून बनविलेल्या विविध कलाकृती असलेले साहित्य, लाेकरीचे ब्लॅंकेट, सुती कापड यासह विविध वस्तू अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बनविण्यात येत हाेत्या. मात्र मागील काही काळापासून हे बंद झाले आहे. तसेच हे साहित्य बनविण्यासाठी असलेली यंत्रसामग्री अमरावती येथील कारागृहात हलविण्यात आली आहे. त्यामुळे अकाेला कारागृहातील कैद्यांकडून शेती व इतर कामे करून घेण्यात येतात.

पॅराेलला पसंती

अकाेला जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या कैद्यांची पॅराेलला पसंती आहे. पॅराेलवर जामीन घेऊन बाहेर येण्यासाठी कैद्यांची चढाओढ असते. मात्र यामधील सत्य कारण असलेल्यांनाच पॅराेलवर जामीन देण्यात आला आहे. इतरांना मात्र त्यांची कारणे बघता, जामीन नाकारण्यात आला आहे.

काेराेना काळात शेती कसली

जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी काेराेना काळात यंत्रसामग्री नसल्याने शेती कसल्याची माहिती आहे, तर अनेक कैद्यांना काेराेना झाल्यामुळे त्यांना विलगीकरण करून आराम देण्यात आला. मध्यवर्ती कारागृहातील तब्बल १५२ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती. मात्र आता कारागृह काेराेनामुक्त बनले आहे.

कारागृहातील कैद्यांना वरिष्ठ स्तरावरून असलेल्या आदेशानुसार कामे देण्यात येतात. काेराेना काळापासून कामे कमी झाली असली तरी त्यांच्याकडून शेतीतील कामे करून घेण्यात येत आहेत. भाजीपाला पिकविण्याचे कामही आता कैद्यांकडून करण्यात येत आहे. काेराेनामुळे त्यांची वारंवार आराेग्य तपासणीही करण्यात येते.

- सुभाष निर्मळ

अधीक्षक, जिल्हा मध्यवर्ती कारागृह, अकाेला़