शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शेतजमीन खरडली; पिके बुडाली, शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:19 IST

अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात जमीन खरडून गेली असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. ...

अकोला: अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात जिल्ह्यातील विविध भागात जमीन खरडून गेली असून, पिके पाण्यात बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला. शेतातील पिके वाहून गेल्याने, पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. शेती आणि पिकांच्या नुकसानाचे पंचनामे प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले असले तरी, नुकसान भरपाईची मदत केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी केलेल्या पाहणीदरम्यान समोर आले आहे.

जिल्ह्यात २१ जुलै रोजी रात्रभर मुसळधार पाऊस बरसला असून, त्यामुळे जिल्ह्यातील नदी आणि नाल्यांना पूर आला होता. अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात शेतातील पिके पाण्याखाली गेली. नदी व नाल्याकाठासह शेतातील पाटांना आलेल्या पुराने शेतजमीन खरडून गेली. तसेच काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी शेतात साचलेल्या पाण्यात पिके बुडाली. अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात मूृग, उडीद, कपाशी, सोयाबीन, तूर इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पिकांच्या लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. नदी व नाल्याचे पूर ओसरल्यानंतर पिकांच्या नुकसानाचे पंचनामे जिल्हा प्रशासनामार्फत सुरु करण्यात आले असून, पीक नुकसान भरपाईची मदत शासनाकडून केव्हा आणि किती मिळणार, याबाबतची प्रतीक्षा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

नफ्याने केलेल्या शेतातील

मुगाचे पीक गेले वाहून!

पाच एकर नफ्याने केलेल्या शेतात मूग पेरणी केल्यानंतर अतिवृष्टी व पुराच्या तडाख्यात शेतातील पाटाच्या पुरात एक एकर मुगाचे पीक वाहून गेले. तसेच शेतात पावसाचे पाणी साचल्याने शेतातील मुगाचे उभे पीक सडत आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान झाले असून, लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे, अशी व्यथा घुसर येथील शेतकरी डिगांबर रामचंद्र कांगटे यांनी मांंडली.

.....................फोटो.......................

लोणार नाल्याकाठची जमीन

खरडली; पिके वाहून गेली!

आपोती आणि आपातापा गावामधून वाहणाऱ्या लोणार नाल्याला आलेल्या पुरात नाल्याकाठची जमीन खरडली असून, शेतातील पिके पाण्याखाली गेली. तसेच अनेक शेतातील पिके नाल्याच्या पुरात वाहून गेली. कपाशी, मूग, तूर इत्यादी पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.

......................फोटो................

ठोक्याने केलेल्या शेतातील

कपाशीचे पीक बुडाले !

२५ हजार रुपयांत ठाेक्याने केलेल्या दोन एकर शेतातील कपाशीचे पीक अतिवृष्टी आणि पुराच्या तडाख्यात बुडाले. लागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात गेला आहे. तसेच स्वत:च्या दोन एकर शेतातील एक एकर कपाशीचे पीक पाटाच्या पुरात वाहून गेले. त्यामुळे सरकारने पीक नुकसानाची मदत तातडीने दिली पाहिजे, अशी व्यथा आपातापा येथील शेतकरी रामदास राधाकिसन बोपटे यांनी मांडली.

..................फोटो..........................