शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:20 IST

दहावी, बारावी परीक्षांची तयारी तेल्हारा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात ...

दहावी, बारावी परीक्षांची तयारी

तेल्हारा : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकांची चिंता वाढली आहे.

वाढीव वीज दर कमी करण्याची मागणी

बार्शीटाकळी : कोरोना संक्रमण काळात छुप्या वाढीव दरामुळे सध्या वीज बिलांच्या रकमा वाढलेल्या आहेत. वाढीव दराचे परिपत्रक रद्द करून जुन्या वीज दराप्रमाणे ग्राहकांना वीज बिले द्या, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

पाच दिवसांचा आठवडा; नागरिक त्रस्त

बाेरगाव मंजू : पाच दिवसांच्या आठवड्याने शासकीय कामे प्रलंबित राहत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. यापासून वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ असल्याने गावांचा अपेक्षित विकास होण्यास अडचणी आहेत.

मूर्तिजापूर येथे आज कोरोना तपासणी

मूर्तिजापूर : कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासन निर्देशानुसार मूर्तिजापूर शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती (राष्ट्रीय महामार्गावरील) येथे मंगळवार, २३ मार्च रोजी १० ते ३ वाजेपर्यंत कोरोना तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आठवडी बाजार बंद; शेतकरी संकटात

बोरगाव मंजू : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यास व्यापारी नकार देत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

बंदी असतानाही गुटख्याची विक्री

बाळापूर : बंदी असतानाही तालुक्यातील अनेक भागांत गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. पोलीस विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे बहुतांश नागरिक गुटख्याचे सेवन करीत आहेत. विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

इंधन दरवाढ; यांत्रिक मशागत महागली!

हिवरखेड : पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर परिणाम जाणवत असतानाच ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे.

कोरोनामुळे व्यापाऱ्यांना पुन्हा फटका

अकाेट : गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रशासनाने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसत आहे.

रस्त्यालगत भाजी विक्रेत्यांचा ठिय्या

वाडेगाव : शहरातील प्रमुख रस्त्यांवर, तसेच चौकालगत भाजी, फळ तसेच कपडे विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्याची गरज आहे.

बसफेऱ्या बंद असल्याने ग्रामीण जनता हैराण

हाता : ग्रामीण भागात गत काही दिवसांपासून बसफेऱ्या बंद असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामस्थांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. दुसरीकडे या संधीचा लाभ घेत खासगी वाहनचालकांनी भाडेवाढ केली आहे.

‘माकडांपासून होणारा त्रास थांबवा!’

खानापूर : परिसरात माकडांनी गत काही दिवसांपासून धुडगूस घातला आहे. माकडे शेतात शिरून पिकांचे नुकसान करीत आहेत. माकडांचा वन विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.