शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी हवे मदतीचे ‘कवच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने दडी मारल्याने, जिल्ह्यातील विविध भागांत ...

अकोला : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असली तरी, गेल्या पंधरा दिवसांत पावसाने दडी मारल्याने, जिल्ह्यातील विविध भागांत पेरणीनंतर उगवलेली पिके करपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. पेरणीसाठी केलेला खर्च बुडाल्याने आता दुबार पेरणी कशी करणार, याबाबतचा प्रश्न कोरोनाकाळात आधीच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. त्यानुषंगाने पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी शासनाने मदतीचे ‘कवच’ देण्याची मागणी होत आहे. मात्र, त्यासाठी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात २० जूनपर्यंत अधूनमधून पडलेल्या पावसात जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, पेरणीनंतर पावसात खंड पडल्याने पेरणी केलेल्या शेतांमध्ये काही ठिकाणी पिके उगवली आणि काही ठिकाणी पिके उगवलीच नाहीत. पावसाने मारलेली दडी आणि तापत्या उन्हाच्या तडाख्यात सिंचन सुविधा उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील विविध भागांत उगवलेले सोयाबीन, कपाशी, तूर, मूग व उडीद इत्यादी पिकेदेखील करपली. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली असली तरी पिके करपलेल्या शेतांत दुबार पेरणी केल्याशिवाय पर्याय उरला नाही. हातात असलेला पैसा पेरणीसाठी खर्च झाल्याने आता दुबार पेरणीचा खर्च कसा करणार, याबाबतचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. त्यानुषंगाने पेरणी उलटलेल्या शेतांमध्ये दुबार पेरणीसाठी शासनाने मदतीचे कवच देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे; परंतु त्यासाठी पेरणी उलटलेल्या शेतांमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया संबंधित यंत्रणांकडून केव्हा सुरू होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात केवळ ४४.८ टक्के

क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी!

जिल्ह्यातील सरासरी खरीप पेरणी क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंत निम्म्या क्षेत्रावर पेरणी झाली आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात खरीप पेरणीचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८३ हजार हेक्टर असून, त्यापैकी ८ जुलैपर्यंत २ लाख ४९ हजार हेक्टर (४४.८ टक्के) क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली आहे.