शहरं
Join us  
Trending Stories
1
Nagpur Rains: विदर्भाला पावसाचा तडाखा! नागपूरमध्ये घरांमध्ये पाणी, शाळांना सुट्टी; पुरामुळे अनेक ठिकाणी संपर्क तुटला
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
टेस्ट पासून का रे दूरावा? किंग कोहली म्हणाला; दाढी पिकली रे भावा!
4
FD पेक्षा जास्त परतावा, पण शेअर बाजाराचा धोका नको? आता 'हा' फंड देणार दुप्पट परतावा?
5
'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी
6
२० रुग्णालये, १३,००० कर्मचारी हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत डॉक्टर, एवढी आहे संपत्ती
7
हनुमान चालीसा बोलायचा राशिद, गर्लफ्रेंड झाली फिदा; पण तिथूनच सुरू झाला नवा कांड, युवती...
8
"साहेब, बायको पळाली"; ४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार; पतीची पोलिसांकडे धाव! म्हणाला... 
9
'या' आयपीओचं तुफान लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; शेअर्स खरेदीची लूट
10
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
11
खळबळजनक! प्रायव्हेट व्हिडीओ दाखवून ३ कोटी उकळले अन् धमकावलं, CA ने आयुष्य संपवलं
12
आरारा....खतरनाक; कमी किमतीत स्मार्ट फीचर्स; Mahindra ने लॉन्च केली सर्वात SUV
13
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
14
'धुरंधर'मध्ये दिसलं पाकिस्तान, कुठे शूट झाले हे सीन्स? रणवीर सिंहच्या सिनेमाची चर्चा
15
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
18
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
19
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
20
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट

बैलजाेड्या चाेरी गेलेल्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:16 IST

अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. ...

अकाेला : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा जास्त बैलजाेड्या चाेरीस गेल्या असून, या प्रकाराचे वृत्त लाेकमतने प्रकाशित करताच जिल्ह्यातील शेतकरी एकवटले. या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पाेलीस प्रशासनाच्या ढिम्म कारभाराचा पाढा वाचत मुख्यमंत्र्यांनीच या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय देण्याची मागणी केली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ५०पेक्षा अधिक बैलजाेड्या व गायी चाेरीला गेल्या आहेत. या चाेरीच्या तक्रारी पाेलीस ठाण्यात करण्यात आलेल्या आहेत. मात्र अकाेला पाेलिसांनी अद्याप एकाही बैलजाेडी चाेरीचा तपास न केल्याने पाेलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करीत या शेतकऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी यांना निवदेन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बैलजाेड्या चाेरट्यांचा जिल्हाभर धुडगूस सुरू असताना पाेलीस मात्र एकाही चाेरट्याला अटक करीत नसल्याने जिल्ह्यातील सांगळूद, पळसाे बढे, दहीगाव, बाेरगाव मंजू, धाेतर्डी, उरळ, गाेत्रा, गुडधी यांसह अनेक गावांतील शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित हाेते. यासाेबतच सामाजिक संघटनांचे पदाधिकारीही निवेदन देण्यासाठी आले हाेते. त्यांनी बैलजाेड्या तसेच गायींचा शाेध घेऊन या चाेरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली आहे.

पाेलीस अधीक्षकांनी घालावे लक्ष

तत्कालीन पाेलीस अधीक्षक अमाेघ गावकर यांच्या कार्यकाळात बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण कमी हाेते. मात्र आता बैलजाेड्या चाेरीचे प्रमाण वाढले असून, पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या याकडे लक्ष नसल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्ह्यात चाेरट्यांना चांगले दिवस आले असून, गरीब शेतकऱ्यांच्या बैलांची व गायींची खुलेआम कत्तल हाेत असतांना पाेलीस प्रशासन मात्र सुस्त असल्याची चर्चा आहे.